शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर सलग तिसऱ्या दिवशीही वरुणराजाची कृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 00:50 IST

जालना: शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावत वरूणराजाने कृपा कायम ठेवली. तीन दिवसांपासून संततधार पाऊस

जालना: शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावत वरूणराजाने कृपा कायम ठेवली. तीन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने पिकांना जीवदान मिळण्यासोबतच जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाल्याचे चित्र आहे. तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. दिवस-रात्र पावसाची रिपरिप सुरूच होती. जालना तालुक्यासह सातही तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. पिकांना जीवदान मिळाले असून, यंदा तरी समाधानकारक पीक येईल अशी आशा शेतऱ्यांना आहे. तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या यावर्षी काहीअंशी दिलासा मिळण्याची आशा आहे. जून महिन्यात पाऊस पडला नसला तरी जुलै महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लागत आहे. तीन दिवसांपासूनच्या पावसामुळे नद्या, नाले, ओढे खळखळून वाहत आहेत. पेरणी केल्यावर योग्य पाऊस पडत असल्याने कापसासह सर्वच पिकांचे समाधानकारक उत्पादन निघणार आहे. जालना शहरासह अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर, बदनापूर, भोकरदन तालुक्यात समाधानकारक पाऊस कोसळत आहे. दिवसभर कधी जोरात कधी हलक्या सरी कायम आहेत.पावसामुळे ग्रामीण भागात शेती जलमय झाली आहे. सकल भागात पाणी साचले आहे. जालना शहरातही अनेक रस्ते व सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. नदी, नाले ओसंडून वाहत आहे. जलयुक्तच्या कामांतही चांगला पाणीसाठा दिसून येतो. (प्रतिनिधी)