शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

हजार शाळा संरक्षण भिंतीविना !

By admin | Updated: July 5, 2014 00:42 IST

संजय कुलकर्णी, जालना जिल्हा परिषदेच्या एक हजार शाळांना संरक्षण भिंतीच नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली

संजय कुलकर्णी, जालनाजिल्हा परिषदेच्या एक हजार शाळांना संरक्षण भिंतीच नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली असून, जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक या सरकारी शाळांच्या जागा अतिक्रमणांनी व्यापू लागल्या आहेत. तर काही शाळांच्या जागेचा वापर खाजगी साहित्य टाकण्यासाठी होऊ लागला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जन कार्यावर त्याचा विपरित होतो आहे.दरम्यान, ग्रामीण भागात काही ठिकाणी या प्रकारामुळेच शाळांतील मुख्याध्यापक शिक्षकांचे या अतिक्रमणकर्त्यांबरोबर वाद-विवादाचेही प्रसंग घडत असल्याचे सूत्रांनी सांगितले.या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १५१४ शाळा आहेत. यात १४८२ प्राथमिक तर ३२ माध्यमिक शाळांचा समावेश आहे. या शाळांनी ठिक ठिकाणी मोठ्या जागा मिळाल्या आहेत. विशेषत: ग्रामीण भागात शाळांचा आवार मोठा आहे. ग्रामपंचायतींनी मोठ्या उदात्त हेतून तसेच भविष्यातील विस्तार ओळखून शाळांकरिता जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र काही शाळांची इमारती मर्यादित जागेवर उभ्या आहेत.त्यामुळे त्या त्या ठिकाणी शाळांच्या विस्तारीकरणात मोठ मोठे अडथळे उदभवू लागले आहेत. विशेषत: वर्ग खोल्यांचा प्रश्न भेडसावतोय आहे. त्यातच आता शाळेभोवती संरक्षक भिंतीच नसल्यामुळे काही शाळांच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे थाटली आहेत. मोकळ्या जागेचा वापर कडबा टाकणे, जनावरे बांधणे, शेतीचा माल टाकणे इत्यादी कामांसाठी होत आहे. शाळेची जागा वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. बहुतांश शाळा मुख्य रस्त्यावर आहेत. यामुळे धोका आहे.पक्क्या पण तुटलेल्या आवार भिंतीपक्क्या पण तुटलेल्या आवार भिंती असलेल्या शाळांची संख्या ५६ एवढी आहे. यापैकी बऱ्याच शाळांच्या संरक्षण भिंतींच्या दुरूस्तीचे काम या ना त्या कारणाने रेंगाळले. तुटलेल्या संरक्षण भिंतींमुळे येथील सुरक्षितता धोक्यात आली आहे. दुरूस्तीच्या कामांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे देण्यात आल्याचे काही मुख्याध्यापकांकडून सांगण्यात येते. तारेचा कुंपणाचा आधार१२२ शाळांना तारेचे कुंपण करून शाळेचे संरक्षण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तारेचे कुंपणही अनेक ठिकाणी निघालेले आहे. त्यामुळे जनावरे तेथे जात आहेत. अशा शाळांच्या ठिकाणी नव्याने संरक्षण भिंतीचे काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. काही शाळांना झाडांचे कुंपण२६८ शाळांना झाडांचे कुंपण करण्यात आले आहे. अशा शाळांमधील शिक्षकांच्या प्रयत्नाने शाळेच्या जागेभोवती झाडे लावून संरक्षण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अशा ठिकाणची काही झाडेही उन्मळून पडलेली आहेत. आवार भिंत नसलेल्या शाळाआवार भिंती नसलेल्या शाळांची संख्या ६३९ एवढी आहे. यापैकी काही शाळा वर्दळीच्या रस्त्यांवर आहेत. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी एकाच वेळी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. काही विद्यार्थी पळत सुटतात, त्यामुळे अशा शाळांभोवती आवार भिंतीची गरज आहेअ. अर्धवट आवार भिंतीअर्धवट आवार भिंती असलेल्या शाळांची संख्या ९६ एवढी आहे. अशा शाळांच्या आवार भिंतीचे काम सुरू झाले होते. मात्र ते काही कारणाने बंद पडले. काही शाळांचे अर्धवट काम नंतर वर्षानुवर्षे पूर्ण झालेच नाही. त्यामुळे अशा शाळांभोवतीच्या आवार भिंतीचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. केवळ २ शाळांचे काम सुरूजिल्ह्यात केवळ २ शाळांच्या आवार भिंतीचे काम सुरू आहे. वर्गखोल्यांच्या दुरूस्तीची कामे ज्याप्रमाणे हाती घेण्यात आली, त्याप्रमाणे शाळांच्या आवार भिंतीची कामेही करावीत, अशी अपेक्षा ग्रामीण भागात पालकांमधूनही व्यक्त केली जात आहे.निधीची गरजजिल्ह्यात पक्की आवार भिंती असलेल्या शाळांची संख्या ३२९ एवढी आहे. एकूण शाळांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहे. ज्या ठिकाणी पक्क्या आवार भिंती आहेत, तेथील शाळांची रंगरंगोटीही बऱ्यापैकी झालेली आहे. यापैकी बहुतांश शाळांना प्रवेशद्वार असून ते शाळेच्या वेळेतच उघडे असते. याबाबत जि.प.च्या शिक्षण व आरोग्य सभापती वर्षाताई देशमुख म्हणाल्या की, १००९ शाळांना संरक्षण भिंती नाहीत. या शाळांच्या संरक्षण भिंतीच्या कामांसाठी ७० ते ८० कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे हे एकाचवेळी होणारे काम नाही. मात्र नाविन्यपूर्ण योजनेतून या कामासाठी निधी गरजेचा आहे