शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील हजारोंचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 00:45 IST

औरंगाबाद : पाणीसाठे आटल्याने आणि शेतीपूरक कामे नसल्यामुळे विभागातून सुमारे १० हजार नागरिकांचे स्थलांतर झाल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्याला फेबु्रवारीच्या मध्यान्हातच दुष्काळाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. पाणीसाठे आटल्याने आणि शेतीपूरक कामे नसल्यामुळे विभागातून सुमारे १० हजार नागरिकांचे स्थलांतर झाल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (ईजीएस) कामांत दुपटीने वाढ झालेली असताना योजनेवरील सुमारे १० हजार मजूर कमी झाले आहेत. हे मजूर काम सोडून जाणे म्हणजे स्थलांतरित होणे असा अर्थ लावला जाऊ शकतो, असे मत विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी व्यक्त केले. योजनेच्या कामांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मजूर संख्या मात्र घटली आहे. हमी योजनेवर काम मिळत असले तरी पाण्याची कमतरता मराठवाड्यात जाणवू लागली आहे. त्यामुळे जीवनावश्यक गरजा आणि रोजगार याच्या शोधात मराठवाड्यातील नागरिक बाहेर पडत आहेत. विशेषत: परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. त्यामुळे तेथील नागरिक स्थलांतर करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजूर कमी होण्याची संख्या मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत दिसून येत आहे. ११ हजार ३५६ कामे सुरूआहेत. मागच्या आठवड्यात ६ हजार ६४६ कामे सुरू होती. कामांची संख्या वाढली असली तरी मजुरांची संख्या कमी झाली आहे. विभागातील धरणांमध्ये फक्त ७ टक्के पाणीसाठा आहे. लातूरला महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होतो आहे. मागील ४५ दिवसांत १२४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. रोजगार हमी योजनेच्या कामावर १६५ रुपयांच्या आसपास रोज मिळत असला तरी त्यातून भागेल, अशी शक्यता नसल्यामुळे मजूर संख्या घटू लागली आहे.