शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

बाराशे नाही तेराशे घ्या, पण पाणी शुद्ध द्या

By admin | Updated: August 3, 2014 01:13 IST

धर्माबाद : पालिकेच्या वतीने शहरवासियांना दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक संताप करीत आहेत. यात नळपट्टीही १२०० रुपये करण्यात आली,

धर्माबाद : पालिकेच्या वतीने शहरवासियांना दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक संताप करीत आहेत. यात नळपट्टीही १२०० रुपये करण्यात आली, नळपट्टी १३०० रुपये घ्या पण शुद्ध पाणी द्या, अशी मागणी नागरिक करीत आहेत.मागील दहा वर्षांपासून पालिका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. याकाळात कधीही टॅक्स वाढविण्यात आला नव्हता, आता मात्र पाणीटंचाईचे कारण दर्शवून पालिकेने ८०० रुपयांची नळपट्टी १२०० रुपयापर्यंत वाढविली आहे. त्यात शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. शहराला पाण्याची योजना मंजूर आहे, मात्र सत्ताधाऱ्यांनी लक्ष न दिल्याने पाणी योजना रेंगाळली आहे. विविध करापोटी जमा होणारा पैसा आणि शासनाकडून मिळणारे अनुदा पालिका पदाधिकाऱ्यांच्या ‘खिशात’ जात असल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेश गिरी यांनी केला. नदीला पाणी राहात नाही, हे पालिकेला माहित नव्हते काय? पालिकेने कोणतेही नियोजन न केल्यामुळे शहरात आज पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याचा आरोप आहे. शिक्षक कॉलनीतील बोअर मागील एक महिन्यांपासून बंद आहे, पालिका याकडे लक्ष देण्यास तयार नाही. पाणी पुरवठ्यासाठी जी पाईपलाईन करण्यात आली, ती चुकीची आहे. पाईपलाईन जमिनीखाली असावयास पाहिजे, ती जमिनीवर करण्यात आली. ये- जा करणाऱ्याला तिचा त्रास होत आहे. दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नाही तर पालिकेने नळपट्टी वाढ कशाला केली? असा सवाल शिवसेनेचे शहरप्रमुख राजू शिरामणे यांनी केला. जोपर्यंत जनतेला फिल्टर पाणी दिले जात नाही, तोपर्यंत पालिकेने नळपट्टी वाढवू नये, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल, असे माजी उपनगराध्यक्ष विजयकुमार राठोड यांनी म्हटले आहे. आधी जनतेला शुद्ध पाणी द्या, नंतर १२०० नाही तर १३०० रुपये नळपट्टी घ्या, जनतेच्या आरोग्याशी खेळू नका, याचे परिणाम भोगावे लागतील, असे भारिप- बहुजन महासंघाचे तालुका संघटक निलेश वाघमारे यांनी म्हटले आहे. जनतेला पाणी दूषित येत असून, एक रुपयासुद्ध टॅक्स देणार नाही, अशी भूमिका मधुकर वाघमारे यांनी मांडली. दूषित पाणीपुरवठा, त्यात एकदिवसाआड आणि नळपट्टीमध्ये वाढ करणे, हा एकूणच प्रकार घोर अन्याय करणारा आहे. जनतेला शुद्ध पाणीपुरवठा करणे शक्य नसेल तर नळपट्टी घेणे बंद करा, अशी प्रतिक्रिया व्यंकट पा. मोरे यांनी दिली. गेट क्रमांक २ मध्ये तीन दिवसआड पाणी येते तर कधी येत नाही. फिल्टर विकत घेऊन पाण्याची तहान भागवावी लागत आहे. १० ते १५ मिनीटेच नळाला पाणी येते, यावरुन महिलांमध्ये भांडणेही होत आहेत. वेळोवेळी सांगूनही पालिकेने याकडे लक्ष दिले नाही. हा भाग नगराध्यक्षांचा वार्ड आहे, अशी प्रतिक्रिया भा.वि.से.तालुकाप्रमुख बालाजी बनसोडे यांनी दिली. नळाला दूषित पाणी येत आहे, तेही एक दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. फिल्टरवाल्यांचा व्यवसाय मात्र चांगलाच जोर पकडून आहे. शुद्ध पाणी देता येत नसेल तर पालिका काय कामाची?असा सवाल कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस वर्णी नागभूषण यांनी केला. फुलेनगरमध्ये खड्ड्यातून पाणी भरावे लागते, सदरचे पाणी सांडपाण्यासाठी वापरावे लागते, असे सुदर्शन वाघमारे यांनी सांगितले.(वार्ताहर)