शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

‘मनोधैर्या’साठी टाहो !

By admin | Updated: June 26, 2014 00:33 IST

संजय तिपाले , बीड दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर मोठा गाजावाजा करुन लैंगिक अत्याचार पीडितांसाठी ‘मनोधैर्य’ योजना सुरु करण्यात आली़

संजय तिपाले , बीडदिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर मोठा गाजावाजा करुन लैंगिक अत्याचार पीडितांसाठी ‘मनोधैर्य’ योजना सुरु करण्यात आली़ या योजनेंतर्गत पीडितांच्या पुनर्वसनाचा हेतू होता़ मागील नऊ महिन्यात जिल्ह्यातील ४७ पैकी ३९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत़ मात्र, त्यापैकी केवळ दोनच पीडितांपर्यंत आर्थिक सहाय्य पोहोचले आहे़ उर्वरित पीडितांना ना सहाय्य मिळाले ना मानसिक आधाऱ गुरुवारी ‘सामाजिक न्याय दिन’ त्या पार्श्वभूमीवर घेतलेला आढावा़़जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण हे वाढतेच आहे़ पीडितांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण निम्म्यापेक्षा अधिक आहे़ त्यामुळे महिला, मुलींची सुरक्षितता धोक्यात आहे़ अत्याचार पीडित महिला व मुली यांना समाजात निर्भयपणे जगता यावे व त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी केंद्र सरकारने ‘मनोधैर्य’ योजना आणली़ या योजनेंतर्गत बलात्कार पीडित महिला, मुलींना २ ते ३ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते़ गुन्ह्याच्या तीव्रतेवरुन मदत दिली जाते़ प्रकरणे पोलिसांकडून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होतात़ त्यानंतर जिल्हा क्षतीसहाय व पुनर्वसन समितीकडून मंजुरी मिळताच योजनेचा लाभ संबंधिताना दिला जातो़ २ आॅक्टोबर २०१३ पासून पुढील पीडित महिला, मुलींना या योजनेचा लाभ देण्याची घोषणा झाली होती़ अत्याचार झाल्यापासून पंधरा दिवसात त्यांना लाभ द्यावा असे आदेश आहेत; परंतु ९ महिन्यात केवळ दोघींपर्यंतच मदत पोहोचली आहे़ २ आॅक्टोबर २०१३ ते आजपर्यंत एकूण ४७ प्रकरणे पोलीसांकडून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली़ त्यापैकी ३९ प्रकरणे मंजूर केली़ उर्वरित ८ प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत़़़़तर ती वाचली असती!दोन महिन्यांपूर्वी केज तालुक्यातील जवळबन येथील एका पीडित युवतीने आत्महत्या केली़ तिच्यावर झालेल्या अत्याचाराने ती भयभीत झाली होती़ मरण पत्करुनच तिने स्वत:ची सुटका करुन घेतली़ ‘मनोधैर्य’ मिळाले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता़काय म्हणतात अधिकारी?जिल्हा महिला व बालविकास अधिकारी के़ एफ़ राठोड यांनी सांगितले की, ४७ प्रकरणे दाखल झाली होती़ त्यापैकी ३९ मंजूर झाली आहेत़ आतापर्यंत निधी आला नव्हता़ तो आता प्राप्त झाला आहे़ पीडितांचे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते उघडणे बाकी आहे़ आम्ही बँकेला पत्र दिले आहे़ दहा रुपयांत खाते उघडण्याची परवानगी मिळवली आहे़ गुरुवारपर्यंत सर्व पीडितांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल, असे ते म्हणाले. पीडितांची थट्टा!समितीवरील शासकीय तसेच अशासकीय सदस्य पीडित महिलांच्या घरी भेटही देत नाहीत असा आरोप मानवी हक्क अभियानच्या मनीषा तोकले यांनी केला़ बलात्कार पीडितांसाठी आलेला पैसाही त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल तर याच्यापेक्षा लांच्छनास्पद बाब कुठली असू शकते़ पैशासाठी कोणी स्वत:वर बलात्कार झाला असे कशाला म्हणेन? पीडित महिलांच्या भावनांचा विचार केला पाहिजे़ त्यांना निकष व नियमांच्या तराजूत तोलण्याची गरज नाही़ पीडित महिलांना न्यायासाठी झगडावे लागत असेल तर ही पीडितांची थट्टा असल्याचे त्या म्हणाल्या. दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली.पोलिसांना प्रशिक्षण हवेमहिला अत्याचाराविरोधात कायदे कठोर झाले़ ‘फोक्सा’ हा कायदा आला; परंतु पोलीस हे कायदे व्यवस्थितपणे हाताळत नाहीत असा आरोप चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक तत्वशील कांबळे यांनी केला़ कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी पोलिसांना प्रशिक्षणाची गरज आहे़ पीडितांवरील अत्याचार कधीच भरुन निघू शकत नाही; पण ‘मनोधैर्य’सारख्या योजना त्यांना जगण्याचे बळ देऊ शकतात़ ते त्यांना मिळाले पाहिजे असे ते म्हणाले़चार वर्षांतील अत्याचारवर्षबलात्काराचे गुन्हे२०११ ६४२०१२ ८४२०१३ ९२२०१४ ३०