शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

शहरात टाहो, रस्त्यावर धो-धो

By admin | Updated: June 8, 2014 01:15 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी अक्षरश: वाहून जात आहे.

सुनील कच्छवे , औरंगाबाद
शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी अक्षरश: वाहून जात आहे. पैठणपासून औरंगाबादपर्यंत जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली असून, त्यातून हे पाणी अहोरात्र बाहेर पडत आहे. जायकवाडी धरणातून उचलल्या जाणाऱ्या पाण्यापैकी दररोज तब्बल ४० दशलक्ष लिटर म्हणजे एक चतुर्थांश पाणी गळतीमुळे रस्त्यातच वाया जात आहे.
औरंगाबाद शहरात महिनाभरापासून अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही शहरवासीयांना पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. अनेक भागांत चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.
त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पाण्यासाठी खाजगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. जायकवाडीपासून औरंगाबादपर्यंत जलवाहिनीच्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मनपाच्या ७०० मि. मी. आणि १४०० मि. मी. व्यासाच्या दोन्ही जलवाहिन्यांना ३० पेक्षा जास्त ठिकाणी गळती लागली आहे.
भर उन्हात रस्त्याशेजारी डोह
मनपाच्या दोन्ही जलवाहिन्या पैठण रोडच्या बाजूने गेलेल्या आहेत. जलवाहिन्यांच्या गळतीमुळे या रस्त्याशेजारी अनेक ठिकाणी भर उन्हाळ्यातही पाण्याचे मोठमोठे डोह साचले आहेत. काही ठिकाणी हे पाणी रस्त्याच्या बाजूने वाहताना दिसत आहे.
जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधूनही पाण्याचे मोठमोठे फवारे बाहेर पडत आहेत. मागील कित्येक वर्षांपासून ही गळती सुरू असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. मात्र, मनपा प्रशासनाने तीव्र पाणीटंचाई जाणवत असतानाही या गळत्या थांबविलेल्या नाहीत. शहराजवळील महानुभाव आश्रमापासून ते पैठण शहरापर्यंत रस्त्यालगत ठिकठिकाणी जलवाहिनीतून पाणी गळती लागली आहे. कांचनवाडी, वाल्मी, गेवराई तांडा, अलाना कंपनी, चित्तेगाव, बिडकीन, ढोरकीन आदी ठिकाणी ही गळती सुरू आहे.
मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणातून सध्या दररोज १५० ते १५५ दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. मात्र यापैकी १२५ दशलक्ष लिटर पाणीच शहरापर्यंत पोहोचते. उर्वरित ३० दशलक्ष लिटर पाणी जलवाहिनीच्या गळतीमुळे वाटेतच वाया जाते. ही गळती इथेच थांबत नाही तर शहरातही अंतर्गत जलवाहिन्यांच्या गळतीमुळे आणखी १० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे दररोज केवळ ११५ दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते.