शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या अडकल्या निकषात

By admin | Updated: May 28, 2014 00:42 IST

शिवराज बिचेवार , नांदेड नांदेड जिल्ह्यात जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या काळात एकूण ३१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत़

 शिवराज बिचेवार , नांदेड नांदेड जिल्ह्यात जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या काळात एकूण ३१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत़ परंतू शासनाच्या आत्महत्याग्रस्तांच्या बाबतीत असलेल्या जाचक नियमांमुळे केवळ १३ शेतकर्‍यांच्या आत्महत्या अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत़ फेब्रुवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ६६ हजार २९९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले़ त्यानंतर फेब्रुवारी ते एप्रिल या ३ महिन्यात जिल्ह्यातील २२ शेतकर्‍यांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपविले़ शासनाच्या आकडेवारीनुसार जानेवारी-५, फेब्रुवारी - ५, मार्च-१२, एप्रिल-५, मे-४ अशा एकूण ३१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत़ त्यात अनुदानासाठी फक्त १३ शेतकर्‍यांच्या आत्महत्या पात्र ठरल्या असून ९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत़ तर चौकशीसाठी ९ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत़ पात्र ठरलेल्या १३ शेतकर्‍यांच्या कुटुंंबियांना १० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे़ आत्महत्येच्या संदर्भात मदतीसाठी शासनाच्या असलेल्या जाचक नियमामुळे पीडित कुटुंबे अक्षरक्ष मेटाकुटीला येत आहेत़ कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने अगोदरच दुखात असलेल्या त्यांच्या आप्तांना शासकीय मदतीसाठीही कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात़ त्यासाठी कागदपत्रांची जुळवणी करताना त्यांची आर्थिक पिळवणुकही करण्यात येत असल्याची उदारहणे समोर येत आहेत़ प्रत्यक्षात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून मदत मिळाली नाही़ असे असताना कर्ता पुरुष गेलेल्या कुटुंबियांना तरी, मदतीचा आधार देवून सांत्वन करण्याची गरज आहे़ याकडे प्रशासन तसेच समाजसेवी संघटनांनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे़ एखाद्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्यानंतर मदतीसाठी निश्चित केलेले निकष पूर्ण करताना नातेवाईकांच्या मात्र नाकीनऊ येतात़ बँकेकडून थकित कर्जाचे प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते़ लोहा तालुक्यातील गोलेगाव येथील ४२ वर्षीय संतुका कामाजी गारुळे या शेतकर्‍यांनी १३ मार्च रोजी आत्महत्या केली होती़ ५ एकर मध्ये गहू, हरभरा आवला होता़ बियानांसाठी बँकेचे ९० हजारांचे कर्जही काढले होते़ गारुळे यांच्या आत्महत्येनंतर शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही़ त्यामुळे रोजमजुरी करुन उदरनिर्वाह करावा लागत असल्याची प्रतिक्रिया रेखाबाई गारुळे यांनी दिली़