शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

पोलीस भरतीच्या जागा वाढविण्यासाठी औरंगाबादमध्ये निघाला विद्यार्थ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 6:18 PM

स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या बेरोजगार युवाकांनी विराट मोर्चा काढल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकांनीही मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना दिले.

ठळक मुद्देपोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकांनी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय असा मोर्चा आज सकाळी काढला.

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या बेरोजगार युवाकांनी विराट मोर्चा काढल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकांनीही मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना दिले. या मोर्चाचे आयोजन पोलीस भरती विद्यार्थी कृती समिती आणि पोलीस फॅमिली वेलफेअर असोशिएशनतर्फे केले होते.

पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवकांनी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय असा मोर्चा आज सकाळी काढला. या सुरूवातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मोर्चाला सुरूवात झाली. क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक, शहागंज मार्गे विभागीय आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात आला. यात पोलीस भरतीची तयारी करणारे शेकडो युवकांनी उत्सर्फुतपणे सहभाग नोंदवला.  शेवटी विभागीय आयुक्तांना मागण्याचे निवेदन देऊन मोर्चाचा समारोप झाला. या निवेदनावर पोलीस फॅमिली वेलफेअर असोशिएशनचे दिपक गोफणे, पोलीस भरती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष विनायक भानुसे पाटील, उपाध्यक्ष सिद्धार्थ भालेराव, सचिव मोहम्मद हुसेन शेख आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. मोर्चे करण्याच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे संंघटनेचे अध्यक्ष विनायक भानुसे पाटील यांनी सांगितले.

या आहेत प्रमुख मागण्या- महाराष्ट्रात  २०१८ मध्ये एकुण ३० हजार पोलीसांची भरती करावी. कारण २०१४,१५,१६,१७ मध्ये अनुक्रमे ८,७,७ व ६ हजार ५०० एवढ्याचा जागा भरती केली. - खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा  २८ वरून  ३० करण्यात यावे. - राज्यात पोलीस भरतीची एकदाच लेखी परीक्षा घ्यावी, कारण एक मुलगा अनेक जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रियेत परीक्षा देतो व ऐका पेक्षा अधिक ठिकाणी पात्रही होतो. मात्र रूजू कोणत्याही एकाच जिल्ह्यात होतो. इतर पात्र ठिकाणची त्याची जागा रिक्त राहते.- पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेचा पॅर्टन आणि काठिण्यपातळी एकसारखी असावी.- पोलीस भरती प्रक्रिया जाहीर झाल्यापासून  प्रत्यक्ष पोलीस भरतीची मैदानी चाचणीची प्रक्रिया सुरू करण्याचा कालावधी ३ महिने  असावा.- भरतीत डमी उमेदवार टाळण्यासाठी  सर्वच ठिकाणी बायोमॅट्रीक पद्धतीचा वापर करावा.-भरती प्रक्रिया राबवत असताना एका दिवशी ५०० विद्यार्थ्यांचीच मैदानी चाचणी घेण्यात यावी.- पोलीस पाल्यांना देण्यात येणार्‍या आरक्षणात वाढ करून १० टक्के करावे.- पोलीस कुटुंब आरोग्य योजना पोलीस कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर देखील देण्यात यावी.-पोलीस कर्मचार्‍यांना  ८ तासांचीच ड्युटी असावी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसStudentविद्यार्थी