शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणातही जिल्ह्याची घसरगुंडी !

By admin | Updated: September 24, 2014 00:45 IST

बाबूराव चव्हाण, उस्मानाबाद उस्मानाबाद : बाळ जन्मल्यापासून ते एक वर्षाचे होईपर्यंत शासनाने ठरवून दिलेले लसीकरण शंभर टक्के करणे आवश्यक आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात

बाबूराव चव्हाण, उस्मानाबादउस्मानाबाद : बाळ जन्मल्यापासून ते एक वर्षाचे होईपर्यंत शासनाने ठरवून दिलेले लसीकरण शंभर टक्के करणे आवश्यक आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात या लसीकरणाचे प्रमाण चिंताजनक आहे. नुकत्याच एका संस्थेने केलेल्या सर्व्हेदरम्यान जिल्ह्याचे प्रमाण ६६ वरुन ५८ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. ही बाब आरोग्य विभागाच्या दृष्टीकोनातून धक्कादायक मानली जात आहे. बाळ जन्मल्यापासून ते एक वर्षाचे होईपर्यंत त्याला विविध प्रकारची रोगप्रतिबंधक लस दिली जाते. आरोग्य खात्याच्या वतीने त्याचे नियोजनही करण्यात आलेले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी शासनाच्या वतीने मदर अँड चाईल्ड ट्रॅकिंक सिस्टीम (एमसीटीएस) हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरोदर माता व मुलांना दर्जात्मक आरोग्य सेवा पुरविण्यावर भर दिला जातो. तसेच गरोदर माता, बालक, लसीकरण नोंदणीची माहिती अद्ययावत ठेवून आरोग्य सेवांचा पाठपुरावा करुन सदर प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाते. माता मृत्यू व अर्भक मृत्यू दर कमी करणे हा या मागचा प्रमुख उद्देश आहे. सदरील उपक्रमांतर्गत गरोदर मातांची वेळोवेळी तपासणी करुन जरुरीच्या आवश्यक आरोग्य सुविधांचे नियंत्रण केले जाते. तसेच गरोदर माता व बालकांचे संपूर्ण लसीकरणही करण्यात येते. सेवांपासून वंचित राहिलेल्यांचा पाठपुरावा करुन सेवा दिलेल्यांचा मागोवा घेतला जातो. संपूर्ण लसीकरण तसेच आरोग्य संस्थांमध्ये सुरक्षित प्रसूती यांना पाठबळ दिले जाते. दरम्यान, हा उपक्रम कितीही चांगला असला तरी तो जिल्ह्यात अपेक्षित क्षमतेने राबविला जात नसल्याचे समोर आले आहे. एका संस्थेने (थर्ड पार्टी) जिल्ह्यातील लसीकरणाचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेअंती अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एकीकडे शासन ‘संपूर्ण लसीकरण’ यावर भर देत असताना दुसरीकडे याच्या उलट चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण ६६ टक्क्यावरुन ५८ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. ही बाब प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे. हे चित्र असेच कायम राहिले तर माता आणि अर्भक मृत्यूदर कसा कमी होणार असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होते आहे. बीसीजी लसीकरणाच्या प्रमाणावर नजर टाकली असता, तेही ९८ वरुन ९५ टक्क्यावर आले आहे. पोलिओ लसीकरणही ८६ वरुन ८२ टक्क्यापर्यंत घसरले आहे. गोवरच्या लसीकरणात मात्र काही प्रमाणात वाढ झाली आहे. ते ७७ वरुन ८४ वर पोहचले आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. ल सीकरणा’साठी शासनाने दोन वर्षापूर्वी एमसीटीएस हा उपक्रम सुरु केला आहे. मात्र जिल्ह्यात तोही पूर्ण क्षमतेने राबविला जात नसल्याचेच सर्वेक्षणातून समोर आले आहे. लसीकरणाचे प्रमाण केवळ ५८ टक्के एवढे आहे. म्हणजे आजही ५० टक्के बालकांचे संपूर्ण लसीकरण होत नाही. आरोग्य विभागाकडून होत असलेला हा कानाडोळा भावीपिढीसाठी घातक ठरणार आहे. हे प्रमाणा वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने आता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.ए मसीटीएस हे एक सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये गरोदर माता आणि जन्माला आलेल्या बालकांची नोंद करण्यात येते. त्यानुसार हे सॉफ्टवेअर मेसेजच्या माध्यमातून लसीकरणाची वेळ, तारीख सूचविते. हे दररोज अपडेट होते. असा मेसेज प्राप्त झाल्यानंतरर संबंधित कर्मचाऱ्यांनी घरी जावून माता अथवा बालकाना आवश्यक लस देणे अपेक्षित आहे. या माध्यमातून वर्षभराचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे काहींना चार, काहींना दोन, काहींना एक तर काहींना आठ डोस मिळतात. त्यामुळे शासनाचे ‘संपूर्ण लसीकरण’ हे धोरण साध्य होताना दिसत नाही. एकूणच विचार केला तर आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.