शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
5
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
6
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
7
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
8
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
9
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
12
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
13
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
14
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
15
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
17
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
18
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
19
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
20
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची स्वबळाची तयारी अन् अपक्ष हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 19:05 IST

आपल्या विचारांचे निवडून आलेले अपक्षच सोबत यावेत, यादृष्टीनेही चाचणी सुरू असल्याचे अनेक नेते खाजगीत सांगतात.

- राम शिनगारे 

सध्या भाजप आणि शिवसेना या राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून जोरदार इनकमिंग सुरू आहे. या इनकमिंगचा विचार करतानाच दोन्ही पक्षांची युती होणार असा दावा वरिष्ठ पातळीवर करण्यात येत असतानाच मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र महाजनादेश यात्रा काढली. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून स्वतंत्र तयारी केली आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जोरात असतानाच जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार यावर कोणीही भाष्य करीत नाही. शिवसेना छोटा भाऊ होण्यास तयार नाही आणि भाजप मोठा भाऊ झाल्याचे सांगायला विसरत नाही. राज्यस्तरावर या घटना घडत असतानाच औरंगाबाद भाजपमध्ये काहीतरी वेगळ्याच हालचाली सुरू असल्याचे समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारांचा पराभव झाला. हा पराभव कोणामुळे झाला हे सर्वश्रुत आहे. पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांना भाजपच्या काही नेत्यांनी दगा दिल्याचे जाहीर आरोप केले होते. हा पहिला अंक संपल्यानंतर विधानसभेच्या रूपाने दुसऱ्या अंकाची सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेल्या संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी संपर्क कार्यालय उघडले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा थोडक्यात पराभव झाला होता. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राजू शिंदे यांनी पश्चिमची मागितलेली उमेदवारी आणि त्यांना केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छा यातून योग्य तो संदेश देण्याचे काम भाजपने केले आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सुरू केलेली पाऊलवाट विजयाचा राष्ट्रीय महामार्ग बनेल, असे सांगितले. तर राज्यमंत्री अतुल सावे यांनी २०१४ च्या विधानसभेच्या वेळी घडलेली घटना सांगितली. तेव्हा आपणही अगोदरच संपर्क कार्यालय सुरू केले. पुढे सगळा रस्ता साफ झाला. पूर्व मतदारसंघही युतीच्या काळात शिवसेनेकडे होता. विधानसभा वेगवेगळ्या लढल्यामुळे अतुल सावे यांना तिकीट मिळाले. याचीच पुनरावृत्ती होण्याचे संकेत सावे यांच्या वक्तव्यातून निघतात. पश्चिम मतदारसंघातील कार्यकर्ते अनिल चोरडिया यांनी तर थेट युती तोडण्याची मागणीही याच कार्यक्रमातून केली. एक साधा कार्यकर्ता अशी मागणी थेट पक्षाच्या व्यासपीठावरून जाहीरपणे कशी करू शकतो. बरं ही मागणी झाल्यानंतर एकाही पदाधिकाऱ्याने चोरडियांची मागणी योग्य नाही, असे स्पष्ट केले नाही. यामुळे एकतर भाजपला स्वबळावर लढायचे आहे. त्याची पूर्वतयारी म्हणूनच संभाव्य उमेदवारांना बळ देण्याचे काम भाजप करीत आहे.

दुसरी बाजू म्हणजे, मागील काही वर्षांपासून राजू शिंदे यांना पश्चिममधून विधानसभा लढवायची आहे. २०१४ मध्येच त्यांना पक्षांची उमेदवारी नक्की होती. मात्र त्यांनी जालना लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचे रावसाहेब दानवे यांनी याच कार्यक्रमात सांगितले. त्यावरून त्यांना तिकीट मिळाले नसावे. यावेळी अनुकूल वातावरणाचा फायदा घेण्यासाठी भाजप काही निष्ठावंतांना युती झाल्यानंतर शिवसेनेला सुटलेल्या मतदारसंघात अपक्ष उभे करून निवडून आणले जाऊ शकते. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी कोणत्याही पक्षाची गरज निर्माण होऊ नये. आपल्या विचारांचे निवडून आलेले अपक्षच सोबत यावेत, यादृष्टीनेही चाचणी सुरू असल्याचे अनेक नेते खाजगीत सांगतात. मात्र उघडपणे बोलत नाहीत. हीच स्थिती इतरही मतदारसंघांत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपची स्वबळाची तयारी आहे की अपक्ष उभा करण्याच्या हालचाली हे येत्या काही दिवसांतच दिसून येईल, हे नक्की.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना