शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
3
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
4
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
5
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
6
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
7
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
8
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
9
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
12
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
13
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
14
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
15
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
16
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
17
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
18
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
19
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
20
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याविना शाळेत विद्यार्थ्यांचे हाल

By admin | Updated: July 16, 2014 00:49 IST

सेनगाव : तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.

सेनगाव : तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे तब्बल ११०० विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा परिसरात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
येथील जि. प. प्राथमिक शाळेत ५०० हून अधिक विद्यार्थी आहेत. तर जि.प. माध्यमिक शाळेत जवळपास ६०० विद्यार्थी आहेत. असे दोन्ही शाळेत एकुण ११०० विद्यार्थी आहेत. दुर्लक्षीत असणाऱ्या दोन्ही शाळेत सद्य:स्थितीत पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही शाळेसाठी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली असून परिणामी शाळेत पिण्यासाठी पाणीच नसल्याची स्थिती आहे.
शाळेत पोषण आहार मिळतो; परंतु पाणी मिळत नसल्याची दयनिय परिस्थिती आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना घरुनच दिवसभर पुरेल ऐवढे पाणी घेवून यावे लागत आहे. काही विद्यार्थी पोषण आहार घेतल्यानंतर शाळा परिसरातील हॉटेल, दुकाने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा शोध घेताना दिसत आहेत. तब्बल ११०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नसताना शाळा प्रशासन व शिक्षण विभागही बेफीकीर आहे. शाळेत पर्यायी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना असे होताना मात्र दिसत नाही. शाळेत कायमस्वरुपी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी जेणे करून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबेल, अशी अपेक्षा पालक वर्गातून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
भटंकतीची आली वेळ
सेनगाव येथील जि.प. प्राथमिक व माध्यमिक शाळेत एकुण ११०० विद्यार्थी शिकत आहेत.
सध्या दुर्लक्षीत असणाऱ्या दोन्ही शाळेत सद्य:स्थितीत पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायतीने केलेली पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली.
सेनगाव येथे पाणीपुरवुठ्याची पर्यायी व्यवस्थाच न केल्याने जि.प.च्या दोन्ही शाळांमध्ये पिण्यासाठी पाणीच नसल्याची स्थिती आहे.
शाळेत पोषण आहार मिळतो; परंतु पाणी मिळत नसल्याची दयनिय स्थिती आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना घरुनच दिवसभर पुरेल एवढे पाणी आणावे लागत आहे.
या शाळांमधील काही विद्यार्थी पोषण आहार घेतल्यानंतर परिसरातील हॉटेल, दुकाने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा शोध घेताना दिसत आहेत.
शाळेत कायमस्वरुपी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवण्याची मागणी होत आहे.