शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

राणी उंचेगावात पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: May 7, 2014 23:56 IST

गणेश लोंढे , राणीउंचेगाव घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

गणेश लोंढे , राणीउंचेगाव घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना महिना दीड महिन्यांपासून भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील राणीउंचेगाव हे मोठे गाव आहे. लोकसंख्याही चार हजारांच्या वर आहे. मात्र शासनाच्या नियोजनाअभावी ग्रामस्थांना हाल सोसावे लागत आहेत. गावात पाण्याची सोय व्हावी म्हणून पाच किमी लांबीच्या जलवाहिनीद्वारे १ कोटी ११ लाख रुपये खर्च करुन भारत निर्माण योजनेचे काम करण्यात आले आहे. योजना पूर्ण झाल्यावर पाणीटंचाई संपेल अशी ग्रामस्थांना आशा होती. तीही आतामावळली आहे. २००९ पासून टंचाई कमी होण्याऐवजी सातत्याने वाढतच आहे. विहिरीवरुन जलवाहिनीद्वारे गावात पाणी आणण्यात आले आहे; परंतु ग्रामपंचायतीचे नियोजन कोलमडले आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांची भागम्भाम सकाळपासूनच सुरू असते. जलवाहिनीसोबतच हातपंपही आहे. नियमित देखभाल नसल्यामुळे ९ हातपंप बंद आहेत. पंचायत समितीने हे हातपंप तात्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. कडक उन्हाळ्यातही ग्रामपंचायत पाणीटंचाईचे नियोजन करीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. इंदिरानगर भागातील रहिवाशांना बारमाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांना टँकरसाठी दररोज पैसे मोजावे लागत आहेत. ठराविक भागांमध्ये मुबलक पाणी गावातील काही ठराविक वस्त्या तसेच भागांमध्ये मुबलक पाणीपुरवठा करण्यात येतो. इतर भागातील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. असा भेदभाव केला जातो? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. ग्रामविकास अधिकारी सूर्यवंशी म्हणाले,गावातील ज्या भागामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे, अशा भागामध्ये पाणी सोडण्यासाठी वेगळ्या कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.