शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

अतिक्रमण प्रकरणातून 'वसुली'; नगरसेवक, अधिकाऱ्यांच्या ‘भ्रष्ट’ युतीवर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:08 IST

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे दरवर्षी तब्बल १५०० पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त होतात. त्यातील ५० प्रकरणांमध्येही कारवाई होत नाही, हे विशेष.

ठळक मुद्देमासा जाळ्यात न लागल्यास  रंगविले जाते कारवाईचे नाट्यसामान्यांच्या तक्रारीला केराची टोपली

औरंगाबाद : महापालिकेत मागील अनेक वर्षांपासून नगरसेवक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांची भ्रष्ट युती लपलेली होती. आज सायंकाळी या युतीवर शिक्कामोर्तब झाला. अनधिकृत बांधकामप्रकरणी नगरसेवकाच्या सांगण्यावरून लाखो रुपयांची ‘वसुली’ कशा पद्धतीने होते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे दरवर्षी तब्बल १५०० पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त होतात. त्यातील ५० प्रकरणांमध्येही कारवाई होत नाही, हे विशेष.

शहरातील ११५ वॉर्डांमध्ये बांधकामे मोठ्या प्रमाणात होत असतात. ८० टक्के मालमत्ताधारक महापालिकेकडून बांधकाम परवानगीच घेत नाहीत. जुने घर असेल तर ते पाडून नवीन बांधण्यात येत असेल तर बांधकाम परवानगी घेतली जात नाही. याचाच फायदा काही नगरसेवक, अतिक्रमण हटाव विभागातील अधिकारी, कर्मचारी उचलतात. अतिक्रमण हटाव विभाग अनेकांच्या आवडीचा विभाग आहे. या विभागातून बदली झाली तरी परत त्याच विभागात अधिकारी, कर्मचारी येतात. अनेक वॉर्डांमध्ये नगरसेवक स्वत: अनधिकृत बांधकामाची दखल घेतात. आपला कार्यकर्ता पाठवून अगोदर चाचपणी करण्यात येते. मासा त्वरित गळाला लागला तर ठीक, नाही तर अतिक्रमण हटाव विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्याला बांधकामाच्या ठिकाणी पाठवून साहित्य जप्त करण्यात येते. गर्भगळीत मालमत्ताधारक धावत पळत येतो, मग पुढील ‘बांधकाम’ भ्रष्ट युतीच्या माध्यमाने होते. काही नगरसेवक अनधिकृत बांधकामांकडे लक्ष देत नाहीत. अतिक्रमण हटाव विभागाने आपल्या वॉर्डात येऊन नागरिकांना त्रास देऊ नये अशी तंबीही ते देतात. मात्र, सवयीचे अधिकारी, कर्मचारी आपल्या पंटरमार्फत तक्रार घेऊन पुढील ‘मजले’ अत्यंत सराईतपणे रचतात. 

सामान्यांच्या तक्रारीला केराची टोपलीएखाद्या सर्वसामान्य नागरिकाच्या जागेवर कोणी अतिक्रमण केलेले असेल तर तो महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे उंबरठे झिजवतो. त्याच्या तक्रारीला निव्वळ केराची टोपली दाखविण्यात येते. ज्याने अतिक्रमण केलेले असते त्याला बोलावून या विभागातील अधिकारी, कर्मचारी आपला हेतू साध्य करून घेतात. सर्वसामान्य नागरिक कंटाळून महापालिकेत येणेच बंद करतो.

तक्रारींची दखल का घेतली जात नाहीमहापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे दरवर्षी किमान १५०० पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त होतात. त्यातील ९० टक्के तक्रारी नियमबाह्यपणे केलेल्या अतिक्रमणाच्या असतात. मोजक्याच प्रकरणात अतिक्रमण करणाऱ्याला नोटीस देण्यात येते. अनेक प्रकरणांमध्ये नोटीसनंतर काहीच होत नाही. खूपच दबाव आला तर कारवाईचे निव्वळ ढोंग रचण्यात येते. कारवाई झाली म्हणून अर्ज निकाली काढण्यात येतो.

अतिक्रमण विभागाचे आवडीचे विषयसर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल असे अतिक्रमण हटाव विभागाचे काम अजिबात नाही. प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे डोळेझाक करण्यात येते. अनधिकृत प्लॉटिंगवर अधूनमधून कारवाईचे नाट्य रचण्यात येते. नंतर सोयीनुसार प्लॉटिंग पाडून घेतली जाते. चौकाचौकात हॉटेल, खानावळ, चायनीज् सेंटर चालकांना संरक्षण देण्याच्या नावावर हप्ते वसुली होते.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादEnchroachmentअतिक्रमण