शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील रेशन दुकानांवर डाळीचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST

दुकानदारांचे नियतन लांबले : मोफत तांदूळ पुरवठाही झाला बंद विकास राऊत लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : जिल्ह्यातील रेशन दुकानांवर ...

दुकानदारांचे नियतन लांबले : मोफत तांदूळ पुरवठाही झाला बंद

विकास राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : जिल्ह्यातील रेशन दुकानांवर नियतन लांबल्यामुळे डाळींचा ठणठणाट आहे. डिसेंबरपर्यंतचा धान्य कोटा पुरवल्यानंतर पुढील तीन महिन्यांचा कोटा न दिल्यामुळे सध्या रेशन दुकानांवर डाळीचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र शासनाने दिलेल्या कोट्याचे वाटप झाले आहे. राज्य ग्राहक फेडरेशनकडे वाटपाची जबाबदारी आहे. सध्या पुढील वाटपाची तारीख जाहीर झालेली नसल्यामुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणच्या रेशन दुकानांवर डाळीचे वाटप होत नसल्याचे वृत्त आहे.

जिल्ह्यात १ हजार ८०१ स्वस्त धान्य दुकाने असून, ७ लाख ३२ हजार ४४४ कार्डधारकांची संख्या आहे. यातील प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्न योजना तसेच अंत्योदय योजनेतील शेतकरी असे एकूण ५ लाख ५१ हजार ८०२ कार्डधारक आहेत. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबातील शेतकरी खात्यांची संख्या ७८ हजार २८०, अंत्योदय अन्न योजनेतील ६५ हजार ४८२ तर प्राधान्य कुटुंबातील ४ लाख ८ हजार ४० असे एकूण ५ लाख ५१ हजार ८०२ कार्डधारक आहेत.

जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने - १ हजार ८०१

एकूण शिधापत्रिकाधारक - ७ लाख ३२ हजार ४४४

पिवळे शिधापत्रिकाधारक - ६५ हजार ४८२

केशरी शिधापत्रिकाधारक - ४ लाख ८ हजार ४०

पांढरे शिधापत्रिकाधारक - ३ लाख २४ हजार ४०४

रेशनवर काय मिळते

रेशन दुकानांवर सध्या फक्त गहू, तांदूळ आणि साखर मिळत आहे. याशिवाय दुसरे कुठलेही धान्य दुकानातून दिले जात नाही. शासनाने सध्या मका खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे. पुढील महिन्यापासून मका वाटप होणे शक्य आहे. मोफत तांदळाचे वाटप नोव्हेंबर २०२०पासून बंद केले आहे.

डाळ मिळत नसल्याच्या तक्रारी कुठे

रेशन दुकानांवर औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातही डाळ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. दुकानदारांना डाळ खरेदीसाठी पुरवठा विभाग चालानच देत नाही. त्यामुळे डाळपुरवठा होत नाही, असे एका दुकानदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणाले

प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर यांनी सांगितले, डाळीचा पुरवठा कुठे-कुठे झाला आहे किंवा नाही, याची माहिती घ्यावी लागेल. याविषयीची माहिती घेऊनच याबाबत सांगता येईल.