शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सवलतीत धान्यपुरवठा

By admin | Updated: July 28, 2015 01:18 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुबार पेरणीचे संकटदेखील ओढवले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुबार पेरणीचे संकटदेखील ओढवले आहे. त्यामुळे आठही जिल्ह्यांतील केशरी रंगाच्या शिधापत्रिका असलेल्या दारिद्र्य रेषेवरील सुमारे १० लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्य पुरवठा करण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. ३ रुपये किलोप्रमाणे तांदूळ, तर २ रुपये किलोप्रमाणे गहू शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. १ आॅगस्टपासून याचा पुरवठा सुरू होण्याची शक्यता असून, जास्तीच्या धान्याची मागणी नोंदविण्यासाठी सर्व जिल्ह्यांतील पुरवठा विभागांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. जूननंतर राज्यातील अनेक भागांत पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. यंदाही दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होऊ नये, यादृष्टीने विभागातील आठ जिल्हे आणि विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दरामध्ये अन्नधान्य पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद विभागांत यासंबंधी आदेश जारी झाले असून, यंत्रणा कामाला लागली आहे.पुरवठा अधिकारी संजय जाधवर म्हणाले, २५ टक्के लाभार्थी वाढण्याची शक्यता आहे. धान्य साठा वाढेल, त्यासाठी मागणीदेखील नोंदवावी लागेल. १ आॅगस्टपासून किंवा त्यापुढील आठवड्यापासून वितरण सुरू होऊ शकते. या निर्णयामुळे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट न झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. विभागातील १० लाख शेतकऱ्यांना या योजनेतून धान्य पुरवठा होऊ शकेल. एपीएल (केसरी) रेशनकार्ड असलेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमाह प्रतिव्यक्ती ५ किलो या परिमाणात धान्य देण्यात येईल. केंद्र शासनाकडून इकॉनॉमिक कॉस्टने अ दर्जाचा तांदूळ व गहू खरेदी करून शेतकऱ्यांना अनुक्रमे ३ व २ रुपये किलो या दराने देण्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी दारिद्र्य रेषेवरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता.