शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांना सोसावा लागणार आर्थिक भुर्दंड

By admin | Updated: June 22, 2014 00:10 IST

जालना : रक्त, रक्तघटकांच्या सेवाशुल्कात राज्य सरकारने सुमारे अडीचपट वाढ केल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील रुग्णाांसह कुटुंबियांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

जालना : रक्त, रक्तघटकांच्या सेवाशुल्कात राज्य सरकारने सुमारे अडीचपट वाढ केल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील रुग्णाांसह कुटुंबियांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. दिवसेंदिवस रक्ताची मोठी गरज भासते आहे. विशेषत: घातपात, अपघात, गंभीर आजाराने ग्रासलेल्या रूग्णांना वेगवेगळ्या रक्तगटाच्या पिशव्यांची मोठी गरज निर्माण होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे नातेवाईक दवाखान्यातील खर्चांसह औषधोपचारामुळे आर्थिक विवंचनेत सापडत असताना आता रक्त व रक्त घटकांतील सेवाशुल्कातील अडीचपट वाढ या रुग्णांसह कुटुंबियांना मोठा आर्थिक भुर्दंड देणारी बाब ठरणार आहे. राष्ट्रीय रक्त धोरण व्यवस्थितरीत्या राबविण्याच्या दृष्टीने रक्त व रक्तघटकांवरील सेवाशुल्क सुधारित करण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. रक्त व रक्तघटकांची प्रक्रिया, चााचणी शुल्क सुधाीरत व्हावेत यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने रेड क्रॉस, शासकीय रक्तपेढी, अन्न व औषध प्रशासन यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली १६ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार सुधारित सेवाशुक्लाचा प्रस्ताव राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेस पाठविण्यात आला होता. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दिवसाला चाळीस तर वर्षाला तब्बल बारा हजार रक्तपिशव्यांची गरज भासत आहे. शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीसह जनकल्याण रक्तपेढीवरच रूग्णांसह कुटुंबियांची दारोमदार अवलंबून आहे. या दोन्ही रक्तपेढ्या ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करीत आल्या आहेत. आता सरकारच्या अडीच पट वाढीच्या निर्णयाचा तडाखा रुग्णांसह कुटुंबियांना बसणार, हे स्पष्ट आहे. रक्तपेढ्यांनासुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, असे चित्र आहे. मुळात रक्तपेढ्या चालविणेच मोठे आव्हान ठरले आहे. परंतु विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींच्या भक्कम सहकार्याने या रक्तपेढ्या अविरत सेवा देत आल्या आहेत. (प्रतिनिधी)