शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

मराठवाड्यात अवघा १.८० टक्के जलसाठा; सुमारे ५१ लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 20:24 IST

मान्सून लांबण्याच्या शक्यतेने अडचणीत वाढ 

औरंगाबाद : मराठवाड्यात ९ वर्षांपासून दुष्काळाच्या झळा बसत आहेत. मधली एक- दोन वर्षे सोडली तर पूर्ण दशक दुष्काळी गणले जाण्याची शक्यता आहे. हवामान खाते आणि अभ्यासक यावर्षीही कमी पाऊस असल्याचे सांगत आहेत. 

गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे यावर्षी जलसाठ्यांची भूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विभागातील सर्व लहान-मोठ्या ८७२ प्रकल्पांत १.८० टक्के पाणी सध्या शिल्लक आहे. मागील ५ वर्षांत पहिल्यांदाच विभागातील प्रकल्पांतील पाणीपातळी घटली आहे. समाधानकारक पाऊस झाला नाहीतर हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणे अशक्यप्राय आहे. विभागात ७५ मध्यम प्रकल्प आहेत. मागील तीन वर्षांत सर्वाधिक कमी पाणीसाठा या प्रकल्पांत शिल्लक आहे. २०१७ मध्ये १७ टक्के, २०१८ मध्ये १४ टक्के तर २०१९ मध्ये फक्त २ टक्के पाणी मध्यम प्रकल्पात शिल्लक आहे. विभागात ७४९ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत मागील तीन वर्षांच्या तुलनेत केवळ २ टक्के पाणी आहे. २०१७ मध्ये ११ टक्के, २०१८ मध्ये १२ टक्के, २०१९ मध्ये २ टक्के पाणी प्रकल्पात आहे. लघु आणि मध्यम प्रकल्पांवर ग्रामीण भागांची तहान बऱ्यापैकी भागते. परंतु या प्रकल्पांत पाणीच नसल्यामुळे ग्रामीण भागात टँकरशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा पर्याय शिल्लक नाही.

५१ लाखांच्या आसपास नागरिकांना ३,१६३ च्या आसपास टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. २,२३१ गावांत आणि ७८१ वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरविले जात आहे. ५,३२१ विहिरींचे अधिग्रहण विभागात करण्यात आले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबादमध्ये टँकरचा आकडा मोठा आहे. जालन्यात ६०६ तर औरंगाबादमध्ये १,१२३ टँकर सुरू आहेत. 

या दोन जिल्ह्यांतच विभागाच्या एकूण टँकरच्या संख्येच्या तुलनेत ६० टक्के टँकर सुरू आहेत. यावर्षीच्या उन्हाळ्यात विभागातील मोठ्या ११ प्रकल्पांतील २.५२५९ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. यामुळे अनेक लघु प्रकल्पांतील शिल्लक असलेले पाणीही आटले. मोठ्या प्र्रकल्पांपैकी सर्वाधिक बाष्पीभवन जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचे झाले आहे. जायकवाडीतून जवळपास एक दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

महाराष्ट्रात १५ जूनला मान्सूनचे आगमन हवामानाचे अभ्यासक प्रा.किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, यंदा मान्सून लांबण्याची शक्यता आहे. आयएमडी मान्सूनचे आगमन झाल्याचे सांगत असले तरी केरळपर्यंत मान्सून येण्यास ८ ते १० दिवस लागतील.महाराष्ट्रात १५ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लगेच घाई करू नये. 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीMarathwadaमराठवाडा