शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

मराठवाड्यात अवघा १.८० टक्के जलसाठा; सुमारे ५१ लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 20:24 IST

मान्सून लांबण्याच्या शक्यतेने अडचणीत वाढ 

औरंगाबाद : मराठवाड्यात ९ वर्षांपासून दुष्काळाच्या झळा बसत आहेत. मधली एक- दोन वर्षे सोडली तर पूर्ण दशक दुष्काळी गणले जाण्याची शक्यता आहे. हवामान खाते आणि अभ्यासक यावर्षीही कमी पाऊस असल्याचे सांगत आहेत. 

गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे यावर्षी जलसाठ्यांची भूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विभागातील सर्व लहान-मोठ्या ८७२ प्रकल्पांत १.८० टक्के पाणी सध्या शिल्लक आहे. मागील ५ वर्षांत पहिल्यांदाच विभागातील प्रकल्पांतील पाणीपातळी घटली आहे. समाधानकारक पाऊस झाला नाहीतर हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणे अशक्यप्राय आहे. विभागात ७५ मध्यम प्रकल्प आहेत. मागील तीन वर्षांत सर्वाधिक कमी पाणीसाठा या प्रकल्पांत शिल्लक आहे. २०१७ मध्ये १७ टक्के, २०१८ मध्ये १४ टक्के तर २०१९ मध्ये फक्त २ टक्के पाणी मध्यम प्रकल्पात शिल्लक आहे. विभागात ७४९ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत मागील तीन वर्षांच्या तुलनेत केवळ २ टक्के पाणी आहे. २०१७ मध्ये ११ टक्के, २०१८ मध्ये १२ टक्के, २०१९ मध्ये २ टक्के पाणी प्रकल्पात आहे. लघु आणि मध्यम प्रकल्पांवर ग्रामीण भागांची तहान बऱ्यापैकी भागते. परंतु या प्रकल्पांत पाणीच नसल्यामुळे ग्रामीण भागात टँकरशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा पर्याय शिल्लक नाही.

५१ लाखांच्या आसपास नागरिकांना ३,१६३ च्या आसपास टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. २,२३१ गावांत आणि ७८१ वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरविले जात आहे. ५,३२१ विहिरींचे अधिग्रहण विभागात करण्यात आले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबादमध्ये टँकरचा आकडा मोठा आहे. जालन्यात ६०६ तर औरंगाबादमध्ये १,१२३ टँकर सुरू आहेत. 

या दोन जिल्ह्यांतच विभागाच्या एकूण टँकरच्या संख्येच्या तुलनेत ६० टक्के टँकर सुरू आहेत. यावर्षीच्या उन्हाळ्यात विभागातील मोठ्या ११ प्रकल्पांतील २.५२५९ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. यामुळे अनेक लघु प्रकल्पांतील शिल्लक असलेले पाणीही आटले. मोठ्या प्र्रकल्पांपैकी सर्वाधिक बाष्पीभवन जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचे झाले आहे. जायकवाडीतून जवळपास एक दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

महाराष्ट्रात १५ जूनला मान्सूनचे आगमन हवामानाचे अभ्यासक प्रा.किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, यंदा मान्सून लांबण्याची शक्यता आहे. आयएमडी मान्सूनचे आगमन झाल्याचे सांगत असले तरी केरळपर्यंत मान्सून येण्यास ८ ते १० दिवस लागतील.महाराष्ट्रात १५ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लगेच घाई करू नये. 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीMarathwadaमराठवाडा