शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

मराठवाड्यात अवघा १.८० टक्के जलसाठा; सुमारे ५१ लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 20:24 IST

मान्सून लांबण्याच्या शक्यतेने अडचणीत वाढ 

औरंगाबाद : मराठवाड्यात ९ वर्षांपासून दुष्काळाच्या झळा बसत आहेत. मधली एक- दोन वर्षे सोडली तर पूर्ण दशक दुष्काळी गणले जाण्याची शक्यता आहे. हवामान खाते आणि अभ्यासक यावर्षीही कमी पाऊस असल्याचे सांगत आहेत. 

गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे यावर्षी जलसाठ्यांची भूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विभागातील सर्व लहान-मोठ्या ८७२ प्रकल्पांत १.८० टक्के पाणी सध्या शिल्लक आहे. मागील ५ वर्षांत पहिल्यांदाच विभागातील प्रकल्पांतील पाणीपातळी घटली आहे. समाधानकारक पाऊस झाला नाहीतर हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणे अशक्यप्राय आहे. विभागात ७५ मध्यम प्रकल्प आहेत. मागील तीन वर्षांत सर्वाधिक कमी पाणीसाठा या प्रकल्पांत शिल्लक आहे. २०१७ मध्ये १७ टक्के, २०१८ मध्ये १४ टक्के तर २०१९ मध्ये फक्त २ टक्के पाणी मध्यम प्रकल्पात शिल्लक आहे. विभागात ७४९ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत मागील तीन वर्षांच्या तुलनेत केवळ २ टक्के पाणी आहे. २०१७ मध्ये ११ टक्के, २०१८ मध्ये १२ टक्के, २०१९ मध्ये २ टक्के पाणी प्रकल्पात आहे. लघु आणि मध्यम प्रकल्पांवर ग्रामीण भागांची तहान बऱ्यापैकी भागते. परंतु या प्रकल्पांत पाणीच नसल्यामुळे ग्रामीण भागात टँकरशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा पर्याय शिल्लक नाही.

५१ लाखांच्या आसपास नागरिकांना ३,१६३ च्या आसपास टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. २,२३१ गावांत आणि ७८१ वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरविले जात आहे. ५,३२१ विहिरींचे अधिग्रहण विभागात करण्यात आले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबादमध्ये टँकरचा आकडा मोठा आहे. जालन्यात ६०६ तर औरंगाबादमध्ये १,१२३ टँकर सुरू आहेत. 

या दोन जिल्ह्यांतच विभागाच्या एकूण टँकरच्या संख्येच्या तुलनेत ६० टक्के टँकर सुरू आहेत. यावर्षीच्या उन्हाळ्यात विभागातील मोठ्या ११ प्रकल्पांतील २.५२५९ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. यामुळे अनेक लघु प्रकल्पांतील शिल्लक असलेले पाणीही आटले. मोठ्या प्र्रकल्पांपैकी सर्वाधिक बाष्पीभवन जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचे झाले आहे. जायकवाडीतून जवळपास एक दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

महाराष्ट्रात १५ जूनला मान्सूनचे आगमन हवामानाचे अभ्यासक प्रा.किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, यंदा मान्सून लांबण्याची शक्यता आहे. आयएमडी मान्सूनचे आगमन झाल्याचे सांगत असले तरी केरळपर्यंत मान्सून येण्यास ८ ते १० दिवस लागतील.महाराष्ट्रात १५ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लगेच घाई करू नये. 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीMarathwadaमराठवाडा