शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मराठवाड्यात अवघा १.८० टक्के जलसाठा; सुमारे ५१ लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 20:24 IST

मान्सून लांबण्याच्या शक्यतेने अडचणीत वाढ 

औरंगाबाद : मराठवाड्यात ९ वर्षांपासून दुष्काळाच्या झळा बसत आहेत. मधली एक- दोन वर्षे सोडली तर पूर्ण दशक दुष्काळी गणले जाण्याची शक्यता आहे. हवामान खाते आणि अभ्यासक यावर्षीही कमी पाऊस असल्याचे सांगत आहेत. 

गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे यावर्षी जलसाठ्यांची भूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विभागातील सर्व लहान-मोठ्या ८७२ प्रकल्पांत १.८० टक्के पाणी सध्या शिल्लक आहे. मागील ५ वर्षांत पहिल्यांदाच विभागातील प्रकल्पांतील पाणीपातळी घटली आहे. समाधानकारक पाऊस झाला नाहीतर हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणे अशक्यप्राय आहे. विभागात ७५ मध्यम प्रकल्प आहेत. मागील तीन वर्षांत सर्वाधिक कमी पाणीसाठा या प्रकल्पांत शिल्लक आहे. २०१७ मध्ये १७ टक्के, २०१८ मध्ये १४ टक्के तर २०१९ मध्ये फक्त २ टक्के पाणी मध्यम प्रकल्पात शिल्लक आहे. विभागात ७४९ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत मागील तीन वर्षांच्या तुलनेत केवळ २ टक्के पाणी आहे. २०१७ मध्ये ११ टक्के, २०१८ मध्ये १२ टक्के, २०१९ मध्ये २ टक्के पाणी प्रकल्पात आहे. लघु आणि मध्यम प्रकल्पांवर ग्रामीण भागांची तहान बऱ्यापैकी भागते. परंतु या प्रकल्पांत पाणीच नसल्यामुळे ग्रामीण भागात टँकरशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा पर्याय शिल्लक नाही.

५१ लाखांच्या आसपास नागरिकांना ३,१६३ च्या आसपास टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. २,२३१ गावांत आणि ७८१ वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरविले जात आहे. ५,३२१ विहिरींचे अधिग्रहण विभागात करण्यात आले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबादमध्ये टँकरचा आकडा मोठा आहे. जालन्यात ६०६ तर औरंगाबादमध्ये १,१२३ टँकर सुरू आहेत. 

या दोन जिल्ह्यांतच विभागाच्या एकूण टँकरच्या संख्येच्या तुलनेत ६० टक्के टँकर सुरू आहेत. यावर्षीच्या उन्हाळ्यात विभागातील मोठ्या ११ प्रकल्पांतील २.५२५९ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. यामुळे अनेक लघु प्रकल्पांतील शिल्लक असलेले पाणीही आटले. मोठ्या प्र्रकल्पांपैकी सर्वाधिक बाष्पीभवन जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचे झाले आहे. जायकवाडीतून जवळपास एक दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

महाराष्ट्रात १५ जूनला मान्सूनचे आगमन हवामानाचे अभ्यासक प्रा.किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, यंदा मान्सून लांबण्याची शक्यता आहे. आयएमडी मान्सूनचे आगमन झाल्याचे सांगत असले तरी केरळपर्यंत मान्सून येण्यास ८ ते १० दिवस लागतील.महाराष्ट्रात १५ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लगेच घाई करू नये. 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीMarathwadaमराठवाडा