शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

पाणी रे पाणी ! मराठवाडा वॉटरग्रीड योजना सरकारच्या लेखी मृगजळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 19:54 IST

नवीन सरकार आल्यानंतर जानेवारी २०२० -२१ च्या मराठवाडा वित्त व नियोजन आढावा बैठकीत योजनेबाबत शंका उपस्थित करण्यात आली.

ठळक मुद्देमराठवाडा वॉटरग्रीडच्या निविदांना धोरणात्मक ब्रेकसरकार १९ महिन्यांपासून योजनेची व्यवहार्यता तपासत आहे

- विकास राऊत

औरंगाबाद: राज्यात सरकार बदलताच मराठवाडा वॉटरग्रीड योजना धोरणाच्या कचाट्यात अडकली आहे. १९ महिन्यांपासून योजनेची व्यवहार्यता तपासण्याचा मुद्दा पुढे करून विद्यमान सरकारने सदरील योजनेच्या पहिल्या टप्प्यात काढलेल्या निविदाही गुंडाळून ठेवल्या आहेत. योजनेचे तोटे आणि फायदे सांगणारे वेगवेगळे मतप्रवाह असल्यामुळे ग्रीडची योजना सध्या ठप्प आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुक आचारसंहितेपूर्वी मराठवाडा वॉटरग्रीडच्या कामाचे भूमीपुजन  करण्याचे नियोजन होते. २२ कोटींतून इस्त्रायलच्या कंपनीने डीपीआरचे काम पुर्ण केले. शेती, पिण्यासाठी, उद्योगांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन ग्रीडमध्ये करण्यात आले आहे. या कामासाठी पहिल्या टप्प्यात १० हजार ५९५ कोटी मंजूर केल्याचा दावा गेल्या सरकारने केला होता. जायकवाडी, उजनी, येलदरी, सिध्देश्वर, विष्णुपुरी, सीना कोळेगांव, माजलगांव, निम्न तेरणा, निम्न मनाड, ईसापूर, पेनगंगा हे ११ धरणे मोठ्या बंद जलवाहिनीने जोडून दुष्काळी भागात पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. ग्रीडमधील वापरण्यात येणाऱ्या जलवाहिनीचा व्यास चारचाकी कार जाईल एवढा मोठा असेल, असे सांगण्यात आले होते. इस्त्रायलच्या कंपनीने जिल्हानिहाय टेंडर काढले. परंतु पुढे निविदांना बे्रक लागला.

नवीन सरकार आल्यानंतर जानेवारी २०२० -२१ च्या मराठवाडा वित्त व नियोजन आढावा बैठकीत योजनेबाबत शंका उपस्थित करण्यात आली. सरकार योजनेची व्यवहार्यता तपासेल, त्यानंतर पुढे जाईल, असे वित्त मंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर आजवरचा काळ आरोग्य उपाययोजनेत गेल्याने त्या योजनेसाठी सरकारी धोरण ठरले नाही. नेमके काय आहे वॉटरग्रीडच्या योजनेत  : १३३० कि.मी. लांबीची मुख्य जलवाहिनी, ११ धरणे एकमेकांशी जोडणे प्रस्तावित, प्रत्येक तालुक्यात पाणी देण्यासाठी ३२२० कि.मी.जलवाहिनी, पहिला टप्पा तरतूद १० हजार ५९५ कोटी रुपये, अशुध्द पाणी, मुख्य जलवाहिनीसाठी ३८५५ कोटींचा खर्च, २०५० पर्यंत ९६० दशलक्ष मीटर पाण्याची गरज, योजनेवरील पुर्ण खर्च सुमारे ४५ हजार कोटी

हा मराठवाड्यावर अन्याय आहेभाजपाचे राज्यसभा सदस्य खा.भागवत कराड यांनी राज्यसरकार आरोप केला. ते म्हणाले, हा राज्यसरकारकडून मराठवाड्यावर अन्याय आहे.१९ महिने सरकार योजनेची व्यवहार्यता तपासण्यात घालविल्यामुळे यापुढे ती योजना राबविण्यात येणाºया आर्थिक अडचणींना कोण जबाबदार असेल, असा सवाल त्यांनी केला. ४० ते ४५ हजार कोटींच्या बजेटची ती योजना आहे. काम पुर्ण झाल्यास विभागातील शेतकºयांना निश्चित फायदाच होईल.

शिवसेनेचे प्रत्युत्तर असेशिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत भाजपावर पटलवार केला. सरकार मराठवाड्यावर काहीही अन्याय करीत नाही. मराठवाडा वैधानिक विकास मंडळावर असतांना खा.कराड यांनी योजनेसाठी पाठपुरावा करणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. सरकार वॉटरग्रीड योजनेबाबत आगामी काळात निश्चित निर्णय घेईल.

वॉटर ग्रीड योजना मराठवाड्यासाठी फायद्याचीचमराठवाडा वॉटर ग्रीड योजना ही विभागासाठी फायद्याचीच आहे. असे मत मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सद्स्य शंकर नागरे यांनी व्यक्त केले. योजनेबाबत  निगेटीव्ह सुर नसावा. या योजनेमुळे नाशिक कडून येणाºया धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी विभागात ग्रीडच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल. मध्यंतरी योजनेचे काम आणि निविदांबाबत विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. परंतु त्यानंतरही पुढे काही झाले नाही. योजना राबविणे सध्या महत्त्वाचे आहे. असेही नागरे म्हणाले. सदरील योजना व्यवहार्यच आहे. असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद