शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

पाणी रे पाणी ! मराठवाडा वॉटरग्रीड योजना सरकारच्या लेखी मृगजळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 19:54 IST

नवीन सरकार आल्यानंतर जानेवारी २०२० -२१ च्या मराठवाडा वित्त व नियोजन आढावा बैठकीत योजनेबाबत शंका उपस्थित करण्यात आली.

ठळक मुद्देमराठवाडा वॉटरग्रीडच्या निविदांना धोरणात्मक ब्रेकसरकार १९ महिन्यांपासून योजनेची व्यवहार्यता तपासत आहे

- विकास राऊत

औरंगाबाद: राज्यात सरकार बदलताच मराठवाडा वॉटरग्रीड योजना धोरणाच्या कचाट्यात अडकली आहे. १९ महिन्यांपासून योजनेची व्यवहार्यता तपासण्याचा मुद्दा पुढे करून विद्यमान सरकारने सदरील योजनेच्या पहिल्या टप्प्यात काढलेल्या निविदाही गुंडाळून ठेवल्या आहेत. योजनेचे तोटे आणि फायदे सांगणारे वेगवेगळे मतप्रवाह असल्यामुळे ग्रीडची योजना सध्या ठप्प आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुक आचारसंहितेपूर्वी मराठवाडा वॉटरग्रीडच्या कामाचे भूमीपुजन  करण्याचे नियोजन होते. २२ कोटींतून इस्त्रायलच्या कंपनीने डीपीआरचे काम पुर्ण केले. शेती, पिण्यासाठी, उद्योगांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन ग्रीडमध्ये करण्यात आले आहे. या कामासाठी पहिल्या टप्प्यात १० हजार ५९५ कोटी मंजूर केल्याचा दावा गेल्या सरकारने केला होता. जायकवाडी, उजनी, येलदरी, सिध्देश्वर, विष्णुपुरी, सीना कोळेगांव, माजलगांव, निम्न तेरणा, निम्न मनाड, ईसापूर, पेनगंगा हे ११ धरणे मोठ्या बंद जलवाहिनीने जोडून दुष्काळी भागात पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. ग्रीडमधील वापरण्यात येणाऱ्या जलवाहिनीचा व्यास चारचाकी कार जाईल एवढा मोठा असेल, असे सांगण्यात आले होते. इस्त्रायलच्या कंपनीने जिल्हानिहाय टेंडर काढले. परंतु पुढे निविदांना बे्रक लागला.

नवीन सरकार आल्यानंतर जानेवारी २०२० -२१ च्या मराठवाडा वित्त व नियोजन आढावा बैठकीत योजनेबाबत शंका उपस्थित करण्यात आली. सरकार योजनेची व्यवहार्यता तपासेल, त्यानंतर पुढे जाईल, असे वित्त मंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर आजवरचा काळ आरोग्य उपाययोजनेत गेल्याने त्या योजनेसाठी सरकारी धोरण ठरले नाही. नेमके काय आहे वॉटरग्रीडच्या योजनेत  : १३३० कि.मी. लांबीची मुख्य जलवाहिनी, ११ धरणे एकमेकांशी जोडणे प्रस्तावित, प्रत्येक तालुक्यात पाणी देण्यासाठी ३२२० कि.मी.जलवाहिनी, पहिला टप्पा तरतूद १० हजार ५९५ कोटी रुपये, अशुध्द पाणी, मुख्य जलवाहिनीसाठी ३८५५ कोटींचा खर्च, २०५० पर्यंत ९६० दशलक्ष मीटर पाण्याची गरज, योजनेवरील पुर्ण खर्च सुमारे ४५ हजार कोटी

हा मराठवाड्यावर अन्याय आहेभाजपाचे राज्यसभा सदस्य खा.भागवत कराड यांनी राज्यसरकार आरोप केला. ते म्हणाले, हा राज्यसरकारकडून मराठवाड्यावर अन्याय आहे.१९ महिने सरकार योजनेची व्यवहार्यता तपासण्यात घालविल्यामुळे यापुढे ती योजना राबविण्यात येणाºया आर्थिक अडचणींना कोण जबाबदार असेल, असा सवाल त्यांनी केला. ४० ते ४५ हजार कोटींच्या बजेटची ती योजना आहे. काम पुर्ण झाल्यास विभागातील शेतकºयांना निश्चित फायदाच होईल.

शिवसेनेचे प्रत्युत्तर असेशिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत भाजपावर पटलवार केला. सरकार मराठवाड्यावर काहीही अन्याय करीत नाही. मराठवाडा वैधानिक विकास मंडळावर असतांना खा.कराड यांनी योजनेसाठी पाठपुरावा करणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. सरकार वॉटरग्रीड योजनेबाबत आगामी काळात निश्चित निर्णय घेईल.

वॉटर ग्रीड योजना मराठवाड्यासाठी फायद्याचीचमराठवाडा वॉटर ग्रीड योजना ही विभागासाठी फायद्याचीच आहे. असे मत मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सद्स्य शंकर नागरे यांनी व्यक्त केले. योजनेबाबत  निगेटीव्ह सुर नसावा. या योजनेमुळे नाशिक कडून येणाºया धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी विभागात ग्रीडच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल. मध्यंतरी योजनेचे काम आणि निविदांबाबत विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. परंतु त्यानंतरही पुढे काही झाले नाही. योजना राबविणे सध्या महत्त्वाचे आहे. असेही नागरे म्हणाले. सदरील योजना व्यवहार्यच आहे. असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद