शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

पाणी रे पाणी ! मराठवाडा वॉटरग्रीड योजना सरकारच्या लेखी मृगजळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 19:54 IST

नवीन सरकार आल्यानंतर जानेवारी २०२० -२१ च्या मराठवाडा वित्त व नियोजन आढावा बैठकीत योजनेबाबत शंका उपस्थित करण्यात आली.

ठळक मुद्देमराठवाडा वॉटरग्रीडच्या निविदांना धोरणात्मक ब्रेकसरकार १९ महिन्यांपासून योजनेची व्यवहार्यता तपासत आहे

- विकास राऊत

औरंगाबाद: राज्यात सरकार बदलताच मराठवाडा वॉटरग्रीड योजना धोरणाच्या कचाट्यात अडकली आहे. १९ महिन्यांपासून योजनेची व्यवहार्यता तपासण्याचा मुद्दा पुढे करून विद्यमान सरकारने सदरील योजनेच्या पहिल्या टप्प्यात काढलेल्या निविदाही गुंडाळून ठेवल्या आहेत. योजनेचे तोटे आणि फायदे सांगणारे वेगवेगळे मतप्रवाह असल्यामुळे ग्रीडची योजना सध्या ठप्प आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुक आचारसंहितेपूर्वी मराठवाडा वॉटरग्रीडच्या कामाचे भूमीपुजन  करण्याचे नियोजन होते. २२ कोटींतून इस्त्रायलच्या कंपनीने डीपीआरचे काम पुर्ण केले. शेती, पिण्यासाठी, उद्योगांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन ग्रीडमध्ये करण्यात आले आहे. या कामासाठी पहिल्या टप्प्यात १० हजार ५९५ कोटी मंजूर केल्याचा दावा गेल्या सरकारने केला होता. जायकवाडी, उजनी, येलदरी, सिध्देश्वर, विष्णुपुरी, सीना कोळेगांव, माजलगांव, निम्न तेरणा, निम्न मनाड, ईसापूर, पेनगंगा हे ११ धरणे मोठ्या बंद जलवाहिनीने जोडून दुष्काळी भागात पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. ग्रीडमधील वापरण्यात येणाऱ्या जलवाहिनीचा व्यास चारचाकी कार जाईल एवढा मोठा असेल, असे सांगण्यात आले होते. इस्त्रायलच्या कंपनीने जिल्हानिहाय टेंडर काढले. परंतु पुढे निविदांना बे्रक लागला.

नवीन सरकार आल्यानंतर जानेवारी २०२० -२१ च्या मराठवाडा वित्त व नियोजन आढावा बैठकीत योजनेबाबत शंका उपस्थित करण्यात आली. सरकार योजनेची व्यवहार्यता तपासेल, त्यानंतर पुढे जाईल, असे वित्त मंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर आजवरचा काळ आरोग्य उपाययोजनेत गेल्याने त्या योजनेसाठी सरकारी धोरण ठरले नाही. नेमके काय आहे वॉटरग्रीडच्या योजनेत  : १३३० कि.मी. लांबीची मुख्य जलवाहिनी, ११ धरणे एकमेकांशी जोडणे प्रस्तावित, प्रत्येक तालुक्यात पाणी देण्यासाठी ३२२० कि.मी.जलवाहिनी, पहिला टप्पा तरतूद १० हजार ५९५ कोटी रुपये, अशुध्द पाणी, मुख्य जलवाहिनीसाठी ३८५५ कोटींचा खर्च, २०५० पर्यंत ९६० दशलक्ष मीटर पाण्याची गरज, योजनेवरील पुर्ण खर्च सुमारे ४५ हजार कोटी

हा मराठवाड्यावर अन्याय आहेभाजपाचे राज्यसभा सदस्य खा.भागवत कराड यांनी राज्यसरकार आरोप केला. ते म्हणाले, हा राज्यसरकारकडून मराठवाड्यावर अन्याय आहे.१९ महिने सरकार योजनेची व्यवहार्यता तपासण्यात घालविल्यामुळे यापुढे ती योजना राबविण्यात येणाºया आर्थिक अडचणींना कोण जबाबदार असेल, असा सवाल त्यांनी केला. ४० ते ४५ हजार कोटींच्या बजेटची ती योजना आहे. काम पुर्ण झाल्यास विभागातील शेतकºयांना निश्चित फायदाच होईल.

शिवसेनेचे प्रत्युत्तर असेशिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत भाजपावर पटलवार केला. सरकार मराठवाड्यावर काहीही अन्याय करीत नाही. मराठवाडा वैधानिक विकास मंडळावर असतांना खा.कराड यांनी योजनेसाठी पाठपुरावा करणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. सरकार वॉटरग्रीड योजनेबाबत आगामी काळात निश्चित निर्णय घेईल.

वॉटर ग्रीड योजना मराठवाड्यासाठी फायद्याचीचमराठवाडा वॉटर ग्रीड योजना ही विभागासाठी फायद्याचीच आहे. असे मत मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सद्स्य शंकर नागरे यांनी व्यक्त केले. योजनेबाबत  निगेटीव्ह सुर नसावा. या योजनेमुळे नाशिक कडून येणाºया धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी विभागात ग्रीडच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल. मध्यंतरी योजनेचे काम आणि निविदांबाबत विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. परंतु त्यानंतरही पुढे काही झाले नाही. योजना राबविणे सध्या महत्त्वाचे आहे. असेही नागरे म्हणाले. सदरील योजना व्यवहार्यच आहे. असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद