शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

पाणी रे पाणी ! मराठवाडा वॉटरग्रीड योजना सरकारच्या लेखी मृगजळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 19:54 IST

नवीन सरकार आल्यानंतर जानेवारी २०२० -२१ च्या मराठवाडा वित्त व नियोजन आढावा बैठकीत योजनेबाबत शंका उपस्थित करण्यात आली.

ठळक मुद्देमराठवाडा वॉटरग्रीडच्या निविदांना धोरणात्मक ब्रेकसरकार १९ महिन्यांपासून योजनेची व्यवहार्यता तपासत आहे

- विकास राऊत

औरंगाबाद: राज्यात सरकार बदलताच मराठवाडा वॉटरग्रीड योजना धोरणाच्या कचाट्यात अडकली आहे. १९ महिन्यांपासून योजनेची व्यवहार्यता तपासण्याचा मुद्दा पुढे करून विद्यमान सरकारने सदरील योजनेच्या पहिल्या टप्प्यात काढलेल्या निविदाही गुंडाळून ठेवल्या आहेत. योजनेचे तोटे आणि फायदे सांगणारे वेगवेगळे मतप्रवाह असल्यामुळे ग्रीडची योजना सध्या ठप्प आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुक आचारसंहितेपूर्वी मराठवाडा वॉटरग्रीडच्या कामाचे भूमीपुजन  करण्याचे नियोजन होते. २२ कोटींतून इस्त्रायलच्या कंपनीने डीपीआरचे काम पुर्ण केले. शेती, पिण्यासाठी, उद्योगांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन ग्रीडमध्ये करण्यात आले आहे. या कामासाठी पहिल्या टप्प्यात १० हजार ५९५ कोटी मंजूर केल्याचा दावा गेल्या सरकारने केला होता. जायकवाडी, उजनी, येलदरी, सिध्देश्वर, विष्णुपुरी, सीना कोळेगांव, माजलगांव, निम्न तेरणा, निम्न मनाड, ईसापूर, पेनगंगा हे ११ धरणे मोठ्या बंद जलवाहिनीने जोडून दुष्काळी भागात पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. ग्रीडमधील वापरण्यात येणाऱ्या जलवाहिनीचा व्यास चारचाकी कार जाईल एवढा मोठा असेल, असे सांगण्यात आले होते. इस्त्रायलच्या कंपनीने जिल्हानिहाय टेंडर काढले. परंतु पुढे निविदांना बे्रक लागला.

नवीन सरकार आल्यानंतर जानेवारी २०२० -२१ च्या मराठवाडा वित्त व नियोजन आढावा बैठकीत योजनेबाबत शंका उपस्थित करण्यात आली. सरकार योजनेची व्यवहार्यता तपासेल, त्यानंतर पुढे जाईल, असे वित्त मंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर आजवरचा काळ आरोग्य उपाययोजनेत गेल्याने त्या योजनेसाठी सरकारी धोरण ठरले नाही. नेमके काय आहे वॉटरग्रीडच्या योजनेत  : १३३० कि.मी. लांबीची मुख्य जलवाहिनी, ११ धरणे एकमेकांशी जोडणे प्रस्तावित, प्रत्येक तालुक्यात पाणी देण्यासाठी ३२२० कि.मी.जलवाहिनी, पहिला टप्पा तरतूद १० हजार ५९५ कोटी रुपये, अशुध्द पाणी, मुख्य जलवाहिनीसाठी ३८५५ कोटींचा खर्च, २०५० पर्यंत ९६० दशलक्ष मीटर पाण्याची गरज, योजनेवरील पुर्ण खर्च सुमारे ४५ हजार कोटी

हा मराठवाड्यावर अन्याय आहेभाजपाचे राज्यसभा सदस्य खा.भागवत कराड यांनी राज्यसरकार आरोप केला. ते म्हणाले, हा राज्यसरकारकडून मराठवाड्यावर अन्याय आहे.१९ महिने सरकार योजनेची व्यवहार्यता तपासण्यात घालविल्यामुळे यापुढे ती योजना राबविण्यात येणाºया आर्थिक अडचणींना कोण जबाबदार असेल, असा सवाल त्यांनी केला. ४० ते ४५ हजार कोटींच्या बजेटची ती योजना आहे. काम पुर्ण झाल्यास विभागातील शेतकºयांना निश्चित फायदाच होईल.

शिवसेनेचे प्रत्युत्तर असेशिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत भाजपावर पटलवार केला. सरकार मराठवाड्यावर काहीही अन्याय करीत नाही. मराठवाडा वैधानिक विकास मंडळावर असतांना खा.कराड यांनी योजनेसाठी पाठपुरावा करणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. सरकार वॉटरग्रीड योजनेबाबत आगामी काळात निश्चित निर्णय घेईल.

वॉटर ग्रीड योजना मराठवाड्यासाठी फायद्याचीचमराठवाडा वॉटर ग्रीड योजना ही विभागासाठी फायद्याचीच आहे. असे मत मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सद्स्य शंकर नागरे यांनी व्यक्त केले. योजनेबाबत  निगेटीव्ह सुर नसावा. या योजनेमुळे नाशिक कडून येणाºया धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी विभागात ग्रीडच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल. मध्यंतरी योजनेचे काम आणि निविदांबाबत विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. परंतु त्यानंतरही पुढे काही झाले नाही. योजना राबविणे सध्या महत्त्वाचे आहे. असेही नागरे म्हणाले. सदरील योजना व्यवहार्यच आहे. असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद