शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

आता पाणीपुरवठा करणे मनपाची जबाबदारी नाही!

By admin | Updated: September 13, 2014 00:35 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला तरी त्याची जबाबदारी पालिकेवर राहणार नाही, अशी बेताल उत्तरे मनपा अधिकाऱ्यांनी दिली.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला तरी त्याची जबाबदारी पालिकेवर राहणार नाही, अशी बेताल उत्तरे मनपा अधिकाऱ्यांनी महापौर कला ओझा, पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत दिली. या बैठकीला आयुक्त पी.एम. महाजन यांची उपस्थिती होती.अधिकाऱ्यांना आता पाणीपुरवठ्याच्या कटकटीतून मुक्तता मिळाल्यासारखे वाटत आहे, तर समांतरची कंत्राटदार कंपनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीही (एसीडब्ल्यूयूसीएल) बेजबाबदारपणे वागू लागली आहे. पाणी न आल्यास जबाबदार कोण? यासाठी कंपनीने अधिकारी, अभियंते, लाईनमनची नावे जाहीर केलेली नाहीत, तर पालिका प्रशासनानेदेखील त्यांना या प्रकरणी विचारणा केलेली नाही. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांच्या नशिबी पाण्यासाठी परवड येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पाणीपुरवठा विभागाचे काम १ सप्टेंबरपासून एसीडब्ल्यूयूसीएल करीत आहे. १३ दिवसांमध्ये कंपनीच्या विरोधात नागरिकांकडून आलेल्या तक्रारींबाबत पालिका अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी कुणाकडे तक्रार करावी आणि जबाबदार म्हणून कुणाला विचारावे हे कळण्यास मार्ग नाही. १३ दिवसांतच हा अनुभव आहे, तर कंपनी २० वर्षे काम कसे करणार आणि औरंगाबादकरांना त्याचे काय दुष्परिणाम भोगावे लागणार हे आत्ताच कसे कळणार? सभापती विजय वाघचौरे हे अधिकाऱ्यांची बेताल उत्तरे ऐकून संतापले. ते म्हणाले की, मनपाने योजनेचे खाजगीकरण केले आहे. पूर्ण पालिकेचे नाही. शहरातील सर्वसामान्यांना पाणीपुरवठ्याप्रकरणी ज्या अडचणी येतील त्याचे निरसन अधिकाऱ्यांना करावेच लागेल. प्रभागनिहाय प्रत्येक अधिकाऱ्यावर जबाबदारी दिलीच पाहिजे. कंपनीच्या अरेरावीपुढे नागरिक हतबल झाले, तर त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतील. अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. प्रभागनिहाय पाणीपुरवठा दक्षता समिती गठीत करण्याची त्यांनी मागणी केली. आयुक्त महाजन म्हणाले की, करारात जे नमूद असेल, त्याप्रमाणे कंपनीकडून काम करून घेतले जाईल.गुंठेवारीतील टँकर आणि जनकल्याण म्हणून पाठविण्यात येणारे मोफत टँकर्स ठेकेदाराने बंद केले. सिडको-हडको, उल्कानगरी परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार केली. एन-७ जलकुंभावर मिसारवाडीतील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला होता. उल्कानगरी, जवाहर कॉलनीतील नागरिकांनी पाण्यासाठी उपमहापौरांना निवेदन दिले. शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा कोलमडला.