शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग जगताच्या विकासाला नवी भरारी

By admin | Updated: August 24, 2014 01:49 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पाच्या कामाने आता वेग घेतला आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबादऔरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पाच्या कामाने आता वेग घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत औरंगाबाद शेंद्रा ते बिडकीन पट्ट्यात भव्य अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे. ही वसाहत एकूण तीन फेजमध्ये उभी राहणार असून, पहिल्या फेजसाठीच्या भूसंपादनाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीच्या उभारणीला लवकरच सुरुवात होऊ शकणार आहे. डीएमआयसीमुळे केवळ औरंगाबादच नाही तर संपूर्ण मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नांमुळे औरंगाबादचा डीएमआयसी प्रकल्पात समावेश झाला. उद्योगमंत्री असताना त्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेंद्रा ते बीडकीन पट्ट्यात तब्बल साडेदहा हजार हेक्टरवर आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे. त्यासाठी वर्षभरापासून भूसंपादनाची प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत करमाड येथील ५५५ हेक्टर आणि बिडकीन परिसरातील २,३५१ हेक्टर अशा एकूण २,९०० हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे भूसंपादनाची ही संपूर्ण प्रक्रिया फारसा विरोध न होता पार पडली. तसेच शेतकऱ्यांना जमिनीसाठी एकरी २३ लाख रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाला. आतापर्यंत १,२०० कोटींचा मोबदला डीएमआयसी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहेच; पण त्याआधी भूसंपादनाच्या मोबदल्यापोटीही मोठी रक्कम जिल्ह्यात येणार आहे. डीएमआयसीसाठी आतापर्यंत करमाड आणि बिडकीन येथील २,९०० हेक्टर जमीन संपादित झाली असून, तिच्या मोबदल्याची एकूण रक्कम १,६०० कोटी रुपये एवढी आहे. यापैकी आतापर्यंत करमाड येथे ३०० आणि बिडकीन येथे ९००, अशा एकूण १,२०० कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटपही झाले आहे. शेंद्र्यात ‘स्मार्ट सिटी’डीएमआयसी प्रकल्पांतर्गत शेंद्रा येथे स्मार्ट सिटी उभारण्यात येणार आहे. ही स्मार्ट सिटी सुमारे साडेसहाशे हेक्टरवर उभारली जाणार असून, यामध्ये नागरी व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हे शहर संपूर्णपणे पर्यावरणपूरक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोयी-सुविधांनी युक्त असे असेल. त्यासाठी जपानच्या सहा कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. ज्यामध्ये संकल्पना व पर्यवेक्षणाचे काम जेजीसी कंपनी करीत आहे, तर पर्यवेक्षण व वॉटर प्लांटचे काम मुत्सुबिशी कॉर्पोरेशन करील. अर्बन प्लानिंग कन्सल्टेशनचे काम निक्कने सिक्केई कंपनी करील. ४माहिती तंत्रज्ञानाची जबाबदारी आयबीएम- जपान या कंपनीवर असेल. वॉटर ट्रीटमेंट प्लांटची जबाबदारी एब्रा इंजिनिअरिंगवर असेल, तर वॉटर कन्सल्टेशनचे काम योकाहामा सिटी ही कंपनी करणार आहे.उद्योजकांना मिळेल भरारीऔरंगाबादेतील उद्योजकांना सध्या फारशा मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही येथील उद्योजक जगभरात आपल्या गुणवत्तेच्या बाळावर अधिराज्य गाजवत आहेत. डीएमआयसी प्रकल्प सुरू झाल्यानंतर येथील उद्योजकांना भरारी घेण्यासाठी पंख लावल्यासारखे होईल. आॅटो इंडस्ट्री, औषधी कंपन्या सध्या आघाडीवर आहेत. बीअर कॅपिटल म्हणूनही औरंगाबादकडे बघितले जाते.