शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी कधी पकडणार ?

By admin | Updated: August 5, 2015 00:38 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील समाजसुधारक व विचारवंत शहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला येत्या २० आॅगस्ट रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत.

उस्मानाबाद : महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील समाजसुधारक व विचारवंत शहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला येत्या २० आॅगस्ट रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत. तर कॉमे्रड पानसरे यांच्या हत्येलाही सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. शासन यंत्रणेकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ उस्मानाबाद शहरातील चार हजारांहून अधिक नागरिकांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यभरात ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ हे सर्वव्यापी अभियान राबविले जात आहे. यात विविध उपक्रम आणि प्रबोधनात्मक कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातून एक लाख पत्र भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना लिहिली जात आहेत. यात ‘डॉ. नरेंद्र दाभोळकर के कातील कब पकडे जायेंगे?’ असा सवाल थेट राष्ट्रपती महोदयांना विचारला जात आहे. या अभियानाअंतर्गत उस्मानाबाद अंनिस शाखेच्या वतीने शहरातून तब्बल चार हजार ३१० नागरिकांनी पत्राद्वारे राष्ट्रपतीकडे आपला संताप व्यक्त केला आहे. उस्मानाबाद शाखेच्या वतीने राष्ट्रपतींना पत्र लिहून दाभोळकरांचे खुनी कधी पकडणार? असा प्रश्न विचारण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी उस्मानाबाद शाखेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहरातील विविध ठिकाणी जाऊन नागरिकांना याबाबत आवाहन करीत होते. बसस्थानक, सेंट्रल बिल्डींग, तहसील कार्यालय, जिजाऊ चौक, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, ख्वाजानगर त्याबरोबर विविध महाविद्यालये, खासगी क्लासेस, पतसंस्था, बँकांमध्ये जाऊन नागरिकांकडून पत्र लिहून घेतले. अंनिसच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत सर्वसामान्य नागरिकांनी या प्रकरणातील आपला संताप पत्राद्वारे व्यक्त केला आहे. यासाठी उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष एम. डी. देशमुख, कार्याध्यक्ष भाग्यश्री केसकर, राहुल साळवे, राकेश वाघमारे, अभिजित साहू, अनंत बिरादार, शैलेश पाटील,दीपक क्षीरसागर, सुरज मायाळे, उमेश सुरवसे, रहीम तांबोळी, प्रा. रवी निंबाळकर, विश्वजित खोसे, धम्मपाल बनसोडे, रविकिरण गुरव, प्रा. अमोल दीक्षित, मनीषा कुलकर्णी, स्वानंदी वडगावकर, वा. मा. वाघमारे, सज्जोद्दीन शेख, अब्दुल लतीफ, प्रा. समाधान देशमुख यांच्यासह अंनिसचे पदाधिकारी आणि समविचारी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)