शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये मुंडेंचा नित्य संपर्क

By admin | Updated: June 4, 2014 01:35 IST

औरंगाबाद : केंद्रीय ग्रामविकासमंत्री खा. गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याची राजधानी औरंगाबादवर विशेष प्रेम होते.

औरंगाबाद : केंद्रीय ग्रामविकासमंत्री खा. गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याची राजधानी औरंगाबादवर विशेष प्रेम होते. १९७२ साली ते समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. दुष्काळाच्या काळात मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत त्यांनी आंदोलन केले. तेव्हापासूनच त्यांची या शहराची नाळ जुळत गेली. भाजपाला औरंगाबादेत मोठे करण्यासाठी त्यांनी अनेक कटू निर्णय घेतले. १९८४ साली मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुणे मतदारसंघातून वेगळा झाल्यानंतर प्रचारासाठी त्यांनी मराठवाडा पिंजून काढला. मुंडे समर्थनगर येथील कार्यालयात जीपने पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. तेथूनच त्यांच्यातील खरा लढवय्या नेता औरंगाबादकरांना कळाला. त्यानंतर १९८८ सालची मनपाची निवडणूक, १९८९-९१ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी औरंगाबादेतील कार्यकर्त्यांची मोट बांधली. १९९३ साली त्यांनी संघर्षयात्रेचे नेतृत्व केले. त्या काळात शहरातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या विचारांशी जोडले गेले. १९९५ नंतर त्यांचे औरंगाबादेतील वास्तव्य आणखी वाढले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे युती सरकारच्या काळात होती. या काळातच माजी आ. श्रीकांत जोशी, माजी आ. हरिभाऊ बागडे, उद्योजक विवेकदेशपांडे, डॉ. भागवत कराड यांच्यासोबत त्यांच्या अनेक राजकीय मसलती होऊ लागल्या. रामा हॉटेलमध्येदेखील ते अनेकदा मुक्कामी असायचे. २००० साली झालेल्या मनपा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेसोबत युती करण्याऐवजी भाजपाला स्वतंत्र मैदानात आणले. १९८८ साली झालेल्या सेना-भाजपाच्या युतीच्या विरोधात प्रथमच मुंडेंनी थेट आव्हान दिले. त्यांच्या या आव्हानामुळे भाजपा एकसंघ लढली, मनपात भाजपाचे प्राबल्य वाढले. २००६ साली प्रमोद महाजन यांचे निधन झाल्यानंतर भाजपा आणि सेनेत जेव्हा-जेव्हा वाद झाले, ते वाद सोडविण्यासाठी मुंडे यांची मध्यस्थी महत्त्वाची असायची. २००७ साली डॉ. कराड यांना महापौरपदासाठी दुसर्‍यांदा संधी फक्त आणि फक्त खा. मुंडे यांच्यामुळेच मिळाली. पक्षातून विरोध असतानाही मुंडेंमुळे ते शक्य झाले होते. २०१० साली भाजपाने शिवसेनेकडून स्थायी समिती सभापतीपद हिसकावले. त्यावरून युती तुटण्यापर्यंत वातावरण निर्माण झाले होते. भाजपा शहराध्यक्षाला मारहाण आणि कार्यालयावर दगडफेक करण्यापर्यंत सेनेने वचपा काढला. तेव्हाही खा. मुंडे यांनी उद्योजक देशपांडे यांच्या घरी बैठक घेऊन तो वाद मिटविला होता. औरंगाबादचे राजकारण आणि समाजकारणात त्यांनी भाजपाला एक जबरदस्त प्लॅटफॉर्म मिळवून दिला होता.