दुष्काळ जाहीर करण्यासाठी औश्यात महायुतीचा मोर्चा

By Admin | Updated: August 20, 2014 01:52 IST2014-08-20T01:05:33+5:302014-08-20T01:52:14+5:30

औसा : औसा व निलंगा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा़ या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी महायुतीच्या वतीने औसा तहसीलवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले़

Mahayuti Morcha in Arya to declare drought | दुष्काळ जाहीर करण्यासाठी औश्यात महायुतीचा मोर्चा

दुष्काळ जाहीर करण्यासाठी औश्यात महायुतीचा मोर्चा




औसा : औसा व निलंगा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा़ या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी महायुतीच्या वतीने औसा तहसीलवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले़
येथील किल्ला मैदानावरून निघालेला मोर्चा शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने, संपर्क प्रमुख धोंडू पाटील, जिल्हा प्रमुख पप्पू कुलकर्णी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किरण उटगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला़ तसेच तहसीलदारांना दुष्काळ जाहीर करावा, पीक विमा मंजूर करावा, शेतकऱ्यांचे पीककर्ज व वीजबिल माफ करावे, जनावरांसाठी चारा छावण्या काढाव्यात, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आला़
यावेळी धोंडू पाटील, पप्पू कुलकर्णी, शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे आदींची भाषणे झाली़ (वार्ताहर)


सरकारला जनतेची काळजी नाही़ महाराष्ट्रातील शेतकरी सध्या तिहेरी संकटात सापडला आहे़ गारपीट, दुबार पेरणी व आता दुष्काळ अशा परिस्थितीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे़ शेतकऱ्यावर सारखे संकट येत आहेत़ सध्याचे आघाडी सरकार हे निष्क्रिय असून, या सरकारला घरी बसवा, औसा विधानसभा मतदारसंघ भाजपाला सोडण्याची मागणीही किरण उटगे यांनी पक्ष निरीक्षकांकडे यावेळी केली़

Web Title: Mahayuti Morcha in Arya to declare drought