शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

लुटमारी महाराष्ट्रात, ठेवी आंध्रात!

By admin | Updated: November 19, 2014 01:00 IST

औरंगाबाद : गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी अटक केलेल्या आंध्राच्या टोळीने गेल्या दोन वर्षांत केवळ औरंगाबादेच नव्हे, तर नांदेडपासून ते मनमाडपर्यंत ‘

औरंगाबाद : गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी अटक केलेल्या आंध्राच्या टोळीने गेल्या दोन वर्षांत केवळ औरंगाबादेच नव्हे, तर नांदेडपासून ते मनमाडपर्यंत ‘रेल्वे ट्रॅक’वरील गाव, शहरांमध्ये अनेक नागरिकांना लुटले असल्याचे उघडकीस आले आहे. महाराष्ट्रात लुटमारी, ठकबाजी करायची अन् आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील बँक खात्यावर तात्काळ पैसे जमा करायचे... अशी या टोळीची पद्धत होती. काही महिन्यांतच आरोपींच्या एकाच खात्यावर तब्बल ३३ लाख रुपयांची उलाढाल झालेली असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. गुन्हे शाखा पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून अरुण कुमार अब्राहम पटेल (२०, रा. बिटरगुंटा, चिल्लोर, आंध्र प्रदेश), अनिल दयाराम मायकेल (२८), मधू भास्कर रेड्डी (१९), चंद्रमा कोंड्या सल्ला (५०), अपराम पेटला (४५), दुर्गा नागराज (४०), सावित्री रेड्डी (४५) व रौसय्या गोडीथ्थ (४८) या आरोपींना अटक केली होती. या आरोपींनी गेल्याच आठवड्यात वाळूज एमआयडीसी परिसरातील एका पंपावर गाडीत डिझेल भरणाऱ्या व्यापाऱ्याला कारवर घाण पडल्याची थाप मारून त्याचे साडेतीन लाख रुपये लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर कुणाच्या अंगावर घाण फेकून, कुणाच्या गाडीचे टायर पंक्चर करून, तर कुणाला थाप मारून लक्ष विचलित करीत या आरोपींनी विविध बँकांसमोरून नागरिकांच्या बॅगा पळविल्याचे अनेक गुन्हे केल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे. नर्सरी चालवीत असल्याचा बहाणा!हे आरोपी गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादेतील बजाजनगर परिसरात वास्तव्य करीत आहेत. तेथे त्यांनी एक मोठा फ्लॅट भाड्याने घेतला होता. आम्ही नर्सरी चालवितो, आॅर्डर घेऊन गावाकडून झाडे, रोपे मागवून त्यांची विक्री करतो, असे हे आरोपी लोकांना सांगत असत. विशेष म्हणजे नर्सरीच्या नावाचे व्हिजिटिंग कार्डही आरोपींनी छापले होते. या आरोपींनी औरंगाबादप्रमाणेच परभणी, नांदेड येथेही भाड्याने घरे घेऊन ठेवली आहेत. औरंगाबादला गुन्हा केला की, ते तातडीने रेल्वेने नांदेड किंवा परभणीला जाऊन काही दिवस वास्तव्य करीत. ४मनमाडला गुन्हा केला की, औरंगाबादला येऊन थांबत आणि कधी कधी गुन्हा करून काही जण रेल्वेने सरळ आंध्राला आपल्या गावी जाऊन राहत होते. लपण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी त्यांनी रेल्वे ट्रॅकवर ही घरे घेऊन ठेवली होती, असे तपासात समोर आल्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले. आरोपींच्या एका बँक खात्याचे पासबुक तपासात पोलिसांच्या हाती लागले आहे. या पासबुकवर २०१३ ते आतापर्यंत तब्बल ३३ लाख रुपयांचा भरणा केल्याचे आढळून आले. ४विशेष म्हणजे ज्या ज्या दिवशी शहरात बॅग पळविल्याच्या घटना घडल्या आहेत, त्याच्या दोन-तीन दिवसांनंतरही या खात्यावर मोठी रक्कम भरल्याचे दिसून येते. त्यावरून लुटलेला पैसा ते ‘त्या’ खात्यावर भरणा करीत होते, असे स्पष्ट झाल्याचे पोलीस निरीक्षक आघाव म्हणाले. विशेष म्हणजे हे खाते आंध्र प्रदेशातील नेल्लोर शाखेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लुटलेली रक्कम हे गावाकडे ‘सेफ’ ठेवी म्हणून जमा करायचे, असे तपासात समोर आल्याचेही आघाव यांनी सांगितले.