शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Lockdown In Aurangabad : शंका नको;  लॉकडाऊन वाढणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 6:58 PM

नागरिकांनी स्वयंप्रेरणेने बंद पाळल्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मोठी मदत होणार आहे.  

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणारवाळूज महानगरात दोन दिवस रॅपीड टेस्टिंग मोहीम

औरंगाबाद : रुग्णसंख्या वाढत असल्याने १० ते १८ जुलैपर्यंत शहर आणि वाळूज महानगरात असलेल्या लॉकडाऊनला १८ जुलैनंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले. 

सध्या असलेल्या लॉकडाऊनच्या काळातच (१८ जुलैच्या आत शक्यतो शुक्रवार आणि शनिवार)  वाळूज व परिसरात रॅपीड टेस्टिंंग मोहीम राबविण्यात येईल, जेणेकरून कोरोना संशयित रुग्ण शोधले जातील, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.नागरिकांच्या सहभागामुळे लॉकडाऊन यशस्वी झाले आहे. वाढत जाणारी रुग्णसंख्या थांबविण्यासाठी आमचा सहभाग घ्या, असे नागरिकांचे मत होते. त्यातूनच १० जुलैपासून शहरात संचारबंदी लागू केली आहे. आजपर्यंत लॉकडाऊन काळात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सर्व आस्थापना, उद्योग बंद आहेत. किराणा दुकाने बंद आहेत. शहर आणि वाळूजसह सर्व औद्योगिक वसाहती बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची स्टिकर्स लावून फिरणाऱ्या वाहनांची वर्दळदेखील कमी आहे. पेट्रोलपंपांवर महत्त्वाच्या वाहनांविना कुणालाही इंधन दिले जात नाही. भाजीपाला, फळ मार्केट पूर्णपणे बंद आहेत. नागरिकांनी स्वयंप्रेरणेने बंद पाळल्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मोठी मदत होणार आहे.  

इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन झाले कमीशहरात सध्या रॅपीड अँटिजन टेस्ट सुरू आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची चाचणी करण्यात येत असून, अर्ध्या तासात चाचणीचा अहवाल प्राप्त होत असल्यामुळे बहुतांश प्रमाणात इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचे प्रमाण कमी झाल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले. 

दुकाने रोज उघडण्याचा विचार संचारबंदीचा कालावधी संपल्यानंतर नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी पडू शकते. त्यासाठी सम-विषम प्रमाणात दुकाने सुरू ठेवण्याऐवजी सर्व दुकाने उघडण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय होईल. संचारबंदीनंतर नागरिकांनी मास्क वापरणे, हात सॅनिटाईज करणे किंवा स्वच्छ धुऊनच इतरत्र स्पर्श करावा, सोशल डिस्टन्सिंंग पाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

वाळूज परिसरात १४ दिवसांची संचारबंदी वाळूज औद्योगिक वसाहतीत ४ ते १२ जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर १०  ते १८ जुलैपर्यंत संचारबंदी लागू केलेल्या संचारबंदीत वाळूज परिसराचा समावेश केला. १० ते १८ जुलैदरम्यानच्या संचारबंदीत उद्योजकांनी प्रशासनाला सहकार्य केलेले आहे. वाळूज परिसरात ४ ते १८ जुलैपर्यंत म्हणजे १४ दिवस संचारबंदीचे राहणार आहेत. यात ९ दिवस बहुतांश उद्योगांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची साखळी तुटण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी वाळूजसह सात ग्रामपंचायत परिसराला मिळाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद