शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

‘जार’ वॉटरच्या कारवाईला आली मरगळ

By admin | Updated: May 14, 2014 01:06 IST

लातूर : कोणत्याही चाचणीविना जार वॉटरची विक्री लातूर शहर व जिल्ह्यात जोरदारपणे सुरूच आहे़ जुजबी तपासणीचे सोंग करून कारवाई केल्याचे अन्न व औषधी प्रशासन भासवित आहे़

 लातूर : कोणत्याही चाचणीविना जार वॉटरची विक्री लातूर शहर व जिल्ह्यात जोरदारपणे सुरूच आहे़ जुजबी तपासणीचे सोंग करून कारवाई केल्याचे अन्न व औषधी प्रशासन भासवित आहे़ त्यामुळे जार वॉटरची विक्री जोमातच आहे़ ‘लोकमत’ने आरोग्याशी हानीकारक असणार्‍या या पाण्यासंदर्भात स्टिंग आॅपरेशनद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले़ मात्र अन्न व औषधी प्रशासनाचा वेळकाढूपणा जार वॉटर विक्रीला पोषक ठरत आहे़ लातूर जिल्ह्यात अनाधिकृतपणे जार वॉटरची विक्री करणारे जवळपास ३६ ते ४२ प्लांटधारक आहेत़ त्यांच्याकडे ना अन्न व औषधी विभागाचा परवाना ना स्थानिक संस्थेचा़ बीएसआय मानांकन तर दूरच़ शिवाय, पाण्याची कसलीही चाचणी न करता, शुद्धीकरण न करता, शास्त्रीय पद्धतीचा अवलंब न करता विक्री सुरूच आहे़ ‘लोकमत’ची मालिका सुरू झाल्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने कारवाईचे अधिकार नसल्याचे सांगून हात झटकले होते़ मात्र जिल्हाधिकारी डॉ़विपीन शर्मा यांनी पाण्याची कसलीही चाचणी न करता विक्री होत असेल आणि त्यांच्याकडे परवाना नसेल तर हा व्यवसाय अनाधिकृत व धोकादायक असल्याचे सांगून कारवाई करण्याचे लेखी आदेश अन्न व औषधी प्रशासनाला दिले होते़ त्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने उदगीर शहरात ७ व लातूर शहरातील २ प्लांटधारकांची तपासणी केली़ या तपासणीनंतर कसलीही कारवाई अन्न व औषधी प्रशासनाने केली नाही़ अन्न व औषधी प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांना या संदर्भात विचारले असता ते कधी औरंगाबादला कार्यशाळा तर कधी मुंबईला मिटींग असल्याचे सांगून वेळकाढूचे धोरण अवलंबत आहेत़ अन्न व औषधी निरिक्षक कारवाई चालू असल्याचे सांगत आहेत़ नेमके कारवाईचे गोडबंगाल अन्न व औषधी प्रशासनाकडून समजत नाहीत़ त्यामुळे आजही लातूर शहर व जिल्ह्यात जारद्वारे पाण्याची खुलेआम विक्री सुरूच आहे़ ‘लोकमत’ने या विषयावर प्रबोधन केल्यामुळे जनतेमध्ये जनजागृती झाली आहे़ त्यामुळे जार पाण्याची विक्री थंडावली आहे़ परंतु, प्लांटधारकाचा हा व्यवसाय सुरूच आहे़ केवळ अन्न व औषधी प्रशासनाचे या व्यवसाय धारकांना अभय मिळत असल्याने हा प्रकार चालू आहे़ (प्रतिनिधी) प्रशासन गप्प पाण्याचे शुद्धीकरण करून पॅकबंद पाण्याची विक्री करण्यासाठी किमान २२ चाचण्या घ्याव्या लागतात़ सुक्ष्मजीवशास्त्र व रसायनशास्त्राच्या पदवीधारक त्या प्लांटमध्ये केमिस्ट म्हणून कार्यरत असायला हवेत़ जलशुद्धीकरण केल्यानंतर पॅकबंद पाणी करून विक्री करण्यास कोणाचीही हरकत नाही़ परंतु, शुद्धीकरणही नाही आणि चाचण्याही नाहीत़