शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
4
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
5
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
6
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
7
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
9
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
10
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
11
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
12
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
13
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
14
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
15
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
16
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
17
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
18
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
19
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
20
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाऐवजी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By admin | Updated: June 29, 2014 00:23 IST

भास्कर लांडे ल्ल हिंगोली जिल्ह्यातच हळदीचे चांगले मार्केट असल्यामुळे दोन एकरात १५ पोती खत आणि २७ हजारांचे बियाणे विकत घेवून टाकले; परंतु मान्सूनच्या पाऊस उघडून बसल्याने उन्हामुळे हळद

भास्कर लांडे ल्ल हिंगोली
जिल्ह्यातच हळदीचे चांगले मार्केट असल्यामुळे दोन एकरात १५ पोती खत आणि २७ हजारांचे बियाणे विकत घेवून टाकले; परंतु मान्सूनच्या पूर्वसंध्येला पडलेला पाऊस उघडून बसल्याने उन्हामुळे हळद करपू लागली. म्हणून पाईपलाईनद्वारे पाणी आणून तुषारमार्फत देण्याचा प्रयत्न केला. एवढा खटाटोप करून लाख रूपये घातल्यानंतही हळद उठली नसल्यामुळे घोटादेवी येथील उत्पादकाने हळहळ व्यक्त केली. अल्पश: पावसावर पेरणीचा जुगार खेळलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक उत्पादकाची ही भावना असून यंदा मान्सूनच्या पाण्याऐवजी उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी येत आहे.
गतवर्षी १२ जूनला आगमन झालेल्या पावसाने सातत्य राखल्याने लवकरच पेरण्या आटोपून पिके वाढण्यास सुरूवात झाली होती. यंदा देखील तशीच परिस्थिती राहील, या आशेने जिल्ह्यातील काही उत्पादकांनी धूळपेरणी केली. अगदी मान्सूनच्या सुरूवातीला पाऊस पडल्याने धूळपेरणीचा डाव साधण्याची उत्पादकांना हमी वाटली; पण चित्र पालटले, धूळपेरणीचा जुगार उत्पादकांच्या अंगलट आला. त्याचा फटका हिंगोली तालुक्यातील घोटादेवी येथील सुरेश राजाराम शेळके यांना बसला. मृगनक्षत्रात झालेल्या पावसात शेळके यांनी दोन एकरात १५ हजारांचा १५ पोती डीएपी खत टाकला. त्याआधी २९ हजारांचे हळदीचे बियाणे टाकले. मोठ्या आशेने हळद लागवड करताच पाऊस गायब झाला. उन्हाळाच संपला नसल्याने सूर्य आग ओकू लागला. जमिनीत पाणी मुरलेच नसल्यामुळे आतील उष्णतेमुळे हळद उठण्याचा विषय नव्हता. हातातील ५० हजार पेरणीला घालून आभाळाकडे बघण्याची वेळ शेळके यांच्यावर आली. महागामोलाचे खत-बियाणे टाकून फायदा होत नसल्यामुळे पश्चातापाची वेळ त्यांच्यावर आली. कोणत्याही परिस्थितीत हळदीला वाचविण्याचा निर्धार शेळके यांनी केला.
दोनशे मीटर अंतरावर असलेल्या विहिरीतील पाणी पाईलाईनद्वारे आणले; पण दोन एकरातील हळदीला पुरेल, असे पाणी विहिरीत नव्हते. काहीही करून हळद वाचविण्यासाठी शेळके यांनी आणखी पैसे घातले. ३० हजार रूपये खर्चून तुषारसंच विकत आणला; पण हळद लागवड करून १० दिवस उलटले होते. त्यातच कोरडी जमीन भरमसाठ पाणी पिऊ लागली. बारा-बारा तासाच्या वीज भारनियमनामुळे त्यात बाधा येवू लागली; पण जमीन भिजेना आणि हळद उठेना, अशा संकटात शेळके सापडले. पेरणीपासून आजपर्यंत १ लाख रूपये खर्चून आभाळाकडे पहावे लागत असल्याने त्यांनी हळहळ व्यक्त केली. शेळके यांच्या प्रमाणे जिल्ह्यातील बहुतांश उत्पादक व्यक्त करीत आहेत. मान्सूनच्या पावसावर जुगार खेळण्याचा प्रयत्न आज अंगलट आला. अनेक गावातील शेतकरी लाख-लाख रूपयांना बुडाले. पदरमोड केलेल्या उत्पादकांना आज अन्न गोड लागेना. आधीच जुळवाजुळव करून पेरणीचे बियाणे विकत घेतले होते. आता कोणाकडे हात पसरावे, असा प्रश्न उत्पादकांना पडला आहे.
दिवसेंदिवस पाऊस लांबतच असल्यामुळे उत्पादक पावसाचा धावा करीत आहेत; पण दुबार पेरणी केलेल्या उत्पादकांच्या कडा पाणावल्या आहेत.