शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरून केली संघटनवाढ

By admin | Updated: June 4, 2014 00:45 IST

अनुराग पोवळे, नांदेड नांदेड आणि गोपीनाथ मुंडे यांचे नाते जवळपास ४० वर्षांपासूनचे होते़ भाजपातील कोणताही प्रश्न मग तो निवडीचा असो की पक्षांतर्गत वादाचा़ तो मांडला जायचा

अनुराग पोवळे, नांदेड नांदेड आणि गोपीनाथ मुंडे यांचे नाते जवळपास ४० वर्षांपासूनचे होते़ भाजपातील कोणताही प्रश्न मग तो निवडीचा असो की पक्षांतर्गत वादाचा़ तो मांडला जायचा थेट गोपीनाथ मुंडे यांच्याच कोर्टात़ जनता युवा मोर्चाचे नेतृत्व स्वीकारल्यापासून ते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मराठवाड्यात औरंगाबादनंतर सर्वात मोठे शहर असलेल्या नांदेडमध्ये राजकीयदृष्ट्या संघटन वाढविण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांचे नेहमीच प्रयत्न राहिले़ केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले़ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखत असत़ मुंडे यांच्या नांदेडमधील सहकार्‍यांमध्ये कै़ भोजालाल गवळी, कै़ मदनमामा देशपांडे, माजी आमदार चंद्रकांत मस्की, नंदू कुलकर्णी, सुनील नेरलकर, लक्ष्मणराव गंजेवार, संभाजी पवार, डी़ बी़ पाटील, राम चौधरी, धनाजीराव देशमुख हे त्यांचे जुन्या काळातील सहकारी़ तर प्रवीण साले, चैतन्यबापू देशमुख, अरूंधती पुरंदरे, डॉ़ शोभा वाघमारे, डॉ़ अजित गोपछडे, श्रावण भिलवंडे, दिलीपसिंघ सोडी यांच्याशीही त्यांनी पक्षबांधणीसाठी नेहमीच चर्चा केली़ मुंडे यांनी प्रारंभीच्या काळात मोटारसायकलवरूनच संपूर्ण जिल्हा पालथा घातला होता़ संघटनावाढीचे ध्येय घेवून त्यांनी हा प्रवास केला़ आणीबाणीच्या काळात तरुंगवास भोगल्यानंतर १९७८ च्या निवडणुकीत नांदेडमधून चंद्रकांत मस्की यांचा विजय झाल्यानंतर मुंडे यांचे नेतृत्वगुण, त्यांच्यातील राजकीय कौशल्य पक्षापुढे आले होते़ तत्कालीन संघटनमंत्री वसंतराव भागवत यांनी मुंडे यांच्यासह प्रमोद महाजन यांच्यातील नेतृत्वगुणही जाणले होते़ त्याचआधारे मुंडे यांना १९८० मध्ये परळी विधानसभा निवडणुकीत उभे करण्यात आले होते़ त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सेनेशी युती करायची की नाही याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून विचारणा केली़ ही विचारणा त्यांनी स्वत: गावोगाव जावून केली होती़ नांदेडमध्ये आल्यानंतर ते विश्रामगृहावर थांबण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या निवासस्थानीच मुक्कामी राहत़ यातून ते जिल्ह्यातील परिस्थिती समजून घेत असत़ त्यांच्या संपर्कात आलेला कार्यकर्ता हा त्यांचाच होवून जायचा़ भारतीय जनता पार्टीतील गटबाजीने त्यांना नेहमीच चिंतीत केले होते़ त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचा नेहमीच संदेश दिला़ नांदेडमध्ये पक्षवाढीला चांगली संधी आहे अशी त्यांची नेहमीच धारणा होती़ पक्षबांधणीसाठी सुरुवातीला कार्यकर्ते सक्षम व्हावेत, अशी त्यांची भूमिका होती़ सहकार क्षेत्रात उतरल्याशिवाय विकास नाही हे जाणताना त्यांनी वैद्यनाथ बँकेच्या शाखा मराठवाड्यात सुरू केल्या़ त्यात नांदेडचाही समावेश होता़ २०१२ मध्ये नांदेड महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत नांदेड जिल्हा आपण दत्तक घेत असल्याची घोषणा त्यांनी केली होती़ त्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी मुंडे यांची नांदेडबाबतची महत्वाकांक्षा स्पष्ट झाली होती़ पक्षवाढीसाठी अनेकांना त्यांनी सोबत घेण्याचा प्रयत्न केला़ तसेच पक्ष सोडून जाणार्‍यांनाही त्यांनी पक्षात परत आणण्यासाठी प्रयत्न केले़ याच प्रयत्नात त्यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाचे राम चौधरी यांना पक्षात आणले़ तर मुखेडमध्ये राठोड बंधू आणि कंधार तालुक्यात भाई केशवराव धोंडगे यांच्याशी केलेली मैत्री हा त्याचाच भाग होता़ केवळ राजकीय बाबतीतच त्यांचा नांदेड जिल्ह्याशी संबंध आला असे नाही तर आपत्तीच्या काळातही त्यांनी जिल्ह्यातील जनतेला साथ देण्याचा प्रयत्न केला़ नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्येही शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुंडे यांनी नांदेडचा दौरा केला होता़ तसेच गोदापरिक्रमांतर्गतही जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देवून पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून जनतेच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला होता़