बारावीची परीक्षा आजपासून सुरू
By Admin | Updated: February 18, 2016 00:08 IST2016-02-18T00:00:12+5:302016-02-18T00:08:40+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला (इयत्ता बारावी) १८ फेबु्रवारीपासून सुरुवात होत आहे.

बारावीची परीक्षा आजपासून सुरू
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला (इयत्ता बारावी) १८ फेबु्रवारीपासून सुरुवात होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून ३३ हजार ९६७ मुले आणि १९ हजार ९६३ मुली असे ५३ हजार ९३० विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. यामध्ये १४४१ पुनर्परीक्षार्थ्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील १२६ परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्ती अभियान राबविण्यात येणार असून त्यासंबंधी बैठे तसेच भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. १८ फेब्रुवारी ते २८ मार्च २०१६ या कालावधीत परीक्षा होत आहे. गुरुवारी १८ फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाच्या पेपरने या परीक्षेला प्रारंभ होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हा पेपर होईल. परीक्षा कालावधीत विभागातील कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक तसेच पर्यवेक्षकांची सहविचार सभा घेऊन त्याबाबतच्या सूचना व आदेश पारित केले आहेत. शिक्षण मंडळाने औरंगाबाद जिल्ह्यात १२६ परीक्षा केंद्र निश्चित केले आहेत. या परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक, परीक्षक, पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी केवळ १० मिनिटांपूर्वीच विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका दिल्या (पान २ वर)