शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांची एसटी किती सुरक्षित ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST

* १० वर्षात विना अपघात बस चालविली म्हणून किती जणांचा सत्कार - १२ * १५ वर्षात विना अपघात बस ...

* १० वर्षात विना अपघात बस चालविली म्हणून किती जणांचा सत्कार - १२

* १५ वर्षात विना अपघात बस चालविली म्हणून किती जणांचा सत्कार - ४

औरंगाबाद : प्रवासासाठी आता बहुपर्याय निर्माण झाले आहेत; पण सर्वात सुरक्षित प्रवास आजही एसटीचाच मानला जातो. त्याचे कारणही तसेच आहे, जिल्ह्यात एसटीचे १२०० चालक आहेत. मागील वर्षात ४६ अपघात झाले असून, त्यातील २५ अपघात हे किरकोळ आहेत.

उल्लेखनीय, म्हणजे ६९ वाहनचालक असे आहेत की, त्यांनी मागील ५ ते ३० वर्षात विना अपघात बस चालविली आहे.

सध्या रस्ते सुरक्षा अभियान सुरू आहे. सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळालाच आजही प्रवासी प्राधान्य देतात. कारण, एसटी महामंडळात प्रशिक्षण दिल्यानंतरच प्रवाश्यांसह बस चालविण्याची परवानगी दिली जाते. एसटी महामंडळाकडे जिल्ह्यात १२०० चालक आहेत. त्यापैकी ३० वर्ष विना अपघात बस चालविणारे ७ चालक आहेत. एकही अपघात न करता २५ वर्ष बस चालविणारे १७ चालक, २० वर्ष विना अपघात बस चालविणारे ४ चालक, १५ वर्ष विना अपघात बस चालविणारे ४ तर १२ चालक असे आहेत की, त्यांनी मागील १० वर्षात त्यांच्या हातून एकही अपघात झाला नाही. १४ वाहनचालकांनी मागील ५ वर्षात विना अपघात बस चालवत प्रवाशांना सुरक्षित व सुखरूप प्रवासाचा आनंद दिला आहे.

चौकट

७० ला स्पीड लॉक

एसटी बसला तशी ७० कि.मी चालविण्याची मर्यादा आहे. मीटर ७०च्या स्पीडला लॉक करून ठेवले आहे. त्यापेक्षा अधिक वेगाने चालकांना बस चालविता येत नाही. तरी अपघात होतात, एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जे अपघात होतात, त्यात किरकोळ अपघाताचे जास्त प्रमाण असते. जे अपघात घडतात त्यात सायंकाळच्या गर्दीच्या वेळी जास्त अपघात घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात दुचाकीस्वाराच्या चुकीने अपघात जास्त घडतात. कारण, दुचाकी चुकीच्या दिशेने चालविणे, अचानक ब्रेक लावल्यानंतर पाठीमागील वाहन येऊन धडकने या प्रकारचे अपघात जास्त होतात.

(जोड )