शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

तासन्तास भारनियमनाने दैनंदिन व्यवहार ठप्प

By admin | Updated: May 30, 2014 00:27 IST

जालना : शहरासह जिल्ह्यातील तासन्तास विजेच्या भारनियमनाने व्यापारीपेठेतील व्यवहारासह गावोगावचे जनजीवन पूर्णत: कोलमडले आहे.

जालना : शहरासह जिल्ह्यातील तासन्तास विजेच्या भारनियमनाने व्यापारीपेठेतील व्यवहारासह गावोगावचे जनजीवन पूर्णत: कोलमडले आहे. या जिल्ह्यात शहरी व ग्रमीण भागात तासन्तास भारनियमन सुरू आहे. शहरी भागात किमान आठ तास, ग्रामीण भागात किमान १४ तास भारनियमन होते आहे. त्याशिवाय अघोषित असे भारनियमनही तासन्तास होते आहे. सरासरी शहरी भागात दहा तास तसेच ग्रामीण भागात १६ तास वीजपुरवठा होत नाही, हे विदारक सत्य आहे. भारनियमनाव्यतिरिक्त कालावधीतसुद्धा कमी दाबाने वीजपुरवठा होतो आहे. कधी उच्च दाबानेसुद्धा पुरवठा होत असून, एकूण शहरी व ग्रामीण भागात सुरळीतपणे सलग दहा ताससुद्धा वीजपुरवठा होत नाही. हे वास्तव आहे. संपूर्ण जिल्ह्यात विजेच्या भारनियमनाचे कोणतेही वेळापत्रक आता अस्तित्वात राहिले नाही महावितरण कंपनीने पूर्वी भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्याचे काही महिन्यातच तीन-तेरा वाजले. आता मनमानीपद्धतीने केव्हाही भारनियमन होते आहे. त्याशिवाय विजेचा लपंडाव सुरूच आहे. महावितरण कंपनीच्या या अंदाधुंद कारभाराविरोधात सर्वसामान्य नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु, कंपनीच्या कर्मचार्‍यांपासून वरिष्ठ अधिकार्‍यांना त्याचे काडीचेही सोयर-सुतक नाही. तासन्तास विजेच्या भारनियमनासह लपंडावासंदर्भात महावितरण कंपनीने आजवर एका ओळीनेही खुलासा केला नाही. किंवा माहितीसुद्धा दिली नाही. परिणामी संपूर्ण जिल्ह्यात वीजपुरवठ्याबाबत ठणठणाट कायम आहे. गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शहरी व ग्रामीण भाग दुष्काळापाठोपाठ महागाईने होरपळून निघाला आहे. त्यास्थितीतसुद्धा महावितरण कंपनीने गेल्यावर्षी कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीचे कारण दाखवून मोठ्या प्रमाणावर वीज तोडणीची मोहिम राबविली. आताही कंपनीने संपूर्ण जिल्ह्यात मोहिम राबविण्याचा संकल्प सोडला आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून वसुलीची मोहीम राबविली जात असतांना कंपनीने सुरळीत वीजपुरवठ्यासंदर्भात काडीचेही प्रयत्न केले नाही. उलटपक्षी अनियमित व कमीदाबाने वीजपुरवठा होत असतांना वरिष्ठ अधिकार्‍यांनी वरून दबाव असल्याचे कारण दाखवून नामानिराळे राहण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी) थकबाकीमुक्त भागातही वीज गूल इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांच्या काळात भारनियमन केले जाणार नाही, असे राज्य सरकारने जाहीर केले. परंतु या जिल्ह्यात त्या अनुषंगाने काडीचीही अंमलबजावणी झाली नाही. उलटपक्षी परीक्षांच्या काळात तासन्तास भारनियमन सुरूच होते. या जिल्ह्यातील थकबाकीमुक्त भागांना सुरळीत वीजपुरवठा केला जाईल, अशाही सरकारसह कंपनीनेही वल्गना केल्या. परंतु, नियमितपणे वीजबिले भरणार्‍या भागांमधून आजही तासन्तास भारनियमन होते आहे. बिले भरूनसुद्धा सर्वसामान्य नागरिकांना कंपनीने काडीचाही दिलासा दिला नाही. रखरखत्या उन्हाने संपूर्ण जिल्हा होरपळून निघाला असतांना, कंपनीने सुरळीत वीजपुरवठा करण्यासंदर्भात गांभीर्याने प्रयत्नच केले नाहीत. उलट सर्वसामान्य ग्राहकांना अव्वा की सव्वा बिले हातात टेकवून चेष्टाच सुरूच केली आहे. या वीजबिलांच्या दुरूस्तीसंदर्भात कंपनीने कोणतीही स्वतंत्र यंत्रणाच उभारली नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक वीजबिलांच्या दुरूस्तीसाठी हेलपाटे घालत आहेत.