शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासक नेमण्यासंदर्भात आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:54 IST

महानगरपालिकेवर प्रशासक नेमावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर ४ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महानगरपालिकेवर प्रशासक नेमावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर ४ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. तसेच शहरवासीयांना किमान मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात संपूर्णपणे अपयशी ठरलेल्या महापालिकेच्या विरोधात दाखल झालेल्या २१ जनहित याचिकांवर मंगळवारी झालेल्या एकत्रित सुनावणीत खंडपीठाने मनपाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मनपाच्या कारभारावरही ताशेरे ओढण्यात आले.कायद्याने जी कर्तव्ये करणे बंधनकारक आहे ते कर्तव्ये पार पाडण्यात महानगरपालिकेला अपयश आले आहे. प्रत्येक प्रश्नासाठी, समस्यांसाठी, हक्कासाठी नागरिकांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागतो आहे. त्यामुळे मनपावर प्रशासक नेमण्यात यावा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.महापालिकेच्या विरोधातील २१ जनहित याचिकांवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांच्यासमोर सुनावणी झाली. यात खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, पथदिवे, स्वच्छ वातावरण, पार्किंग, बेकायदा बांधकाम आदींच्या संदर्भातील याचिकांचा समावेश आहे.मंगळवारच्या सुनावणीत उत्तरानगरीच्या पाणीप्रश्नावर म्हणणे सादर करण्यात आले. या वसाहतीतून वर्षाला १८ लाख रुपयांचे कर मनपा वसूल करते. मात्र, या परिसरातला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईनवर मनपा १७ लाख रुपये खर्च करीत नाही. यामुळे येथील पाणीपुरवठ्याचा प्रश्न रेंगाळला आहे. उल्लेखनीय म्हणजे, खंडपीठाने देखील हे काम करण्यासंदर्भात आदेश देऊनही ते झाले नसल्याकडे खंडपीठाचे लक्ष वेधण्यात आले. यासंदर्भातील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.सुखना नदीपात्रात अतिक्रमणे झाली आहेत. नदीपात्रात ड्रेनेज व कारखान्यांमधील रसायनयुक्त पाणी सोडले जाते. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. असा मुद्दा खंडपीठासमोर उपस्थित करण्यात आला. या आणि अशाच इतर अनेक मुद्यांवर मंगळवारी न्यायालयासमोर सविस्तर म्हणणे मांडण्यात आले. सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप देशमुख, अ‍ॅड. देवदत्त पालोदकर, अ‍ॅड. अजित काळे, अ‍ॅड. एन.एल. जाधव, तर मनपातर्फे अ‍ॅड. जयंत शहा, अ‍ॅड. संभाजी टोपे आणि अ‍ॅड. अमित वैद्य, राज्य शासनातर्फे अ‍ॅड. अमरजितसिंह गिरासे आणि अ‍ॅड. सिद्धार्थ यावलकर, केंद्र शासनातर्फे अ‍ॅड. संजीव देशपांडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद