शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पुढे पाठ; मागे सपाट..!

By admin | Updated: July 18, 2016 01:05 IST

उस्मानाबाद : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी ५ लाख ४९ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट होते.

उस्मानाबाद : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी ५ लाख ४९ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात उद्दिष्टाहून अधिक म्हणजे, ६ लाख ६ हजार ६१७ रोपांची लागवड केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. असे असतानाच वन विभागाच्या वतीने घाटंग्री रस्त्यालगत असलेल्या वनक्षेत्रात लागवड केलेली रोपे कक्षरश: करपून जाऊ लागली आहेत. विशेष म्हणजे, या क्षेत्रात वृक्षारोपणाचे काम सुरू असल्याने वृक्षप्रेमींना वन विभागाच्या कारभाराबाबत ‘पुढे पाठ, मागे सपाट’ या युक्तीचा अनुभव येत आहे.उस्मानाबाद शहरापासून काही किमी अंतरावर आणि घाटंग्री रस्त्याला लागून मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. या क्षेत्रातील काही भागात वृक्षांचे प्रमाण विरळ झाले आहे. अशा ठिकाणी वन विभागाकडून नव्याने रोपांची लागवड करण्यात येत आहे. परंतु, ही लागवड करताना खड्डे खोल खोदण्याची तसदी वन विभागाकडून घेतली जात नसल्याचे प्रत्यक्ष खड्डे पाहिल्यानंतर दिसून येते. विशेष म्हणजे, ही रोपे खड्ड्यामध्ये नव्हे, तर खड्ड्यातून निघालेल्या मातीच्या भरावावर लागवड केली आहेत. अनेक भरावाखाली दगडांच्या शिळा आहेत. त्यामुळे सदरील जागा वृक्षरोपनासाठी योग्य आहे की नाही, हे पाहण्याचे कष्टही वन विभागाने घेतले नाही. परिणामी अशा भरावांवरील रोपे करपून गेली आहेत. दरम्यान, लावगड केलेल्यापैकी सध्या पन्नास टक्केही रोपे जगण्याच्या अवस्थेत नाहीत. यानंतरही वन विभागाने रोपांच्या संगोपनाकडे लक्ष न दिल्यास आणखी पंधरा ते वीस टक्के रोपे वाया जाऊ शकतात. दरम्यान, लागवड केलेली रोपे योग्य संगोपनाअभावी करपून जात असताना दुसरीकडे मात्र, वृक्ष लागवडीचा सपाटा सुरूच आहे. त्यामुळे वन विभागाकडून वृक्षारोपणाचा हा फार्स दिखाव्यापुरता तर केला जात नाही ना, असा सवाल आता वृक्षप्रेमींतून उपस्थित केल्या जाऊ लागला आहे. (प्रतिनिधी) खड्डे अर्धा फुटही नाही !वन विभागाने वृक्षारोपण करण्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदले आहेत. हे खड्डेही फार खोल खोदण्यात आलेले नाहीत. साधारणपणे अर्धा फुट खोलीचे खड्डे आहेत. या खड्ड्यांतून निघालेल्या मातीच्या भरावावर रोपांची लागवड केली आहे. मातीमध्ये दगडांचे प्रमाण अधिक असल्याने लागवड केलेली रोपे करपू लागली आहेत. त्यामुळे या पैकी किती रोपे जगतात? की नुसते खड्डेच शिल्लक राहतात, हे येणाऱ्या काळातच दिसून येईल.साठविलेली रोपेही गेली वाया?वन विभागाच्या वतीने वनक्षेत्राच रोपांचा स्टॉक करून ठेवण्यात आला आहे. हीच रोपे सदरील रोपे वनक्षेत्रात लागवड केली जात आहेत. परंतु, या रोपांचीही व्यवस्थीत देखभाल केली जात नसल्याने शेकडो रोपे करपून गेली आहेत. एकीकडे गरजेच्या प्रमाणात रोपे उपलब्ध नसल्याने शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांनी खाजगी रोपवाटीकांतून रोपे विकत घेऊन लागवड केली. तर दुसरीकडे वन विभागाने स्टॉक करून ठेवलेल्यापैकी मोठ्या प्रमाणात रोपे करपून गेली आहेत.