शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या धावपट्टीवरुन पुन्हा विमानाचे उड्डाण

By admin | Updated: March 20, 2016 01:06 IST

नांदेड : नांदेडसह राज्यातील २० विमानतळे रिकामी असताना, महाराष्ट्रासाठी आलेले ८० प्रवासी क्षमतेचे विमान मुंबई येथून गुजरातसाठी जाते़

नांदेड : नांदेडसह राज्यातील २० विमानतळे रिकामी असताना, महाराष्ट्रासाठी आलेले ८० प्रवासी क्षमतेचे विमान मुंबई येथून गुजरातसाठी जाते़ ही बाब एअर इंडियाच्या लक्षात आणून देत, माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी नांदेडची विमानसेवा पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत़ दरम्यान, लवकरच कमी प्रवासीक्षमता असलेले विमान नांदेडच्या धावपट्टीवरुन उड्डाण करेल अशी शक्यता वर्तविली जात आहे़राज्यातील विमानतळांच्या यादीत नांदेडचे विमानतळ सुसज्ज व सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे़ प्रदीर्घ काळ दिल्ली तसेच मुंबई येथून नांदेडसाठी विमानसेवा सुरु राहिली होती़, परंतु प्रवाशांची अनाठायी अडचण समोर करीत, विमानसेवा बंद करण्यातच यंत्रणेने आपला वेळ खर्ची केला़ दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवून विकसनशील भागांना जोडणारी विमानसेवा सुरु ठेवावी अशी आग्रही मागणी केली़ मागील सत्ताकाळात राज्यामध्ये २० विमानतळे विकसित झाली़ नांदेड येथे शीख बांधवांचे पवित्र स्थळ सचखंड गुरुद्वारा आहे़ जगभरातून शीख बांधव नांदेडला येतात़ तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या शहराला व्यापार व उद्योगाच्या विकासासाठी विमानसेवेचा मोठा लाभ होवू शकतो़ त्यामुळे किमान एअर इंडियाने तरी, कमी प्रवासी क्षमतेचे विमान राज्यातील महत्वाच्या विमानतळावरुन उड्डाण करेल याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती़ नांदेड येथून यापूर्वी गो एअर आणि किंगफिशर या दोन कंपन्यांची विमाने उड्डाण करीत होती़ सुरुवातीला गो एअर आणि त्यानंतर किंगफिशरने सेवा बंद केली़नांदेड येथून केवळ नांदेडच नव्हे तर परभणी, हिंगोली, लातूर, बीड या जिल्ह्यांनाही हवाई वाहतुकीचा लाभ होणार आहे़ सद्य:स्थितीत औरंगाबाद अथवा हैदराबाद येथूनच सदर सुविधा उपलब्ध होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते़ ज्यामुळे उद्योग व्यवसायासाठी येणारी मोठी शिष्टमंडळे, उच्च तंत्रज्ञानाशी निगडित मनुष्यबळ सहजपणे उपलब्ध होत नाही़ एकूणच या भागाच्या विकासासाठी नांदेडच्या सुसज्ज विमानतळावरुन एअर इंडियाचे कमी क्षमतेचे विमान धावले पाहिजे, अशी आग्रही मागणीही खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली आहे़ या अनुषंगाने एअर इंडियाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून नांदेडच्या धावपट्टीवरुन लवकरच विमान उड्डाण करेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे़ (प्रतिनिधी)