शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम टप्प्याच्या ५ कोटींची मदत वर्ग

By admin | Updated: June 7, 2014 00:25 IST

अंबड : तालुक्यातील २१ गावातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी तिसऱ्या टप्प्यातील सुमारे ५ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.

अंबड : तालुक्यातील २१ गावातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी तिसऱ्या टप्प्यातील सुमारे ५ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. आतापर्यंत तालुक्यातील १३७ गावातील सुमारे ६२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण ३९ कोटी ४१ लाख ७३ हजार ९३१ रुपयांची मदत वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.
फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते. महसूल विभागाने पंचनामे करुन पात्र शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्याप्रमाणे संबंधितांच्या याद्या तयार करुन पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु केली. अंबड तालुक्यातील १३७ गावातील शेतकऱ्यांना तीन टप्प्यात ही मदत देण्यात आली.
तिसऱ्या टप्प्यातील २१ गावातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेली मदत पुढीलप्रमाणे आहे. बनटाकळी (२९ लाख ३७ हजार रुपये), शिरनेर (२३ लाख ७५ हजार ७५० रुपये), भोकरवाडी (११ लाख ८३ हजार ३०० रुपये), पागीरवाडी (१६ लाख १ हजार ३५० रुपये), लखमापुरी (३१ लाख ५६ हजार ७५० रुपये), बेलगाव (२५ लाख ५७ हजार ५०० रुपये), कुक्कडगाव (२९ लाख ७५ हजार ९५० रुपये), दाढेगाव (४२ लाख ७३ हजार रुपये), पिठोरी सिरसगांव (७३ लाख ७२ हजार ६०० रुपये), चिकनगाव (२० लाख ५५ हजार १०० रुपये), माहेरभायगाव (१९ लाख १७ हजार १५० रुपये), नांदी (२० लाख ६१ हजार १५० रुपये), किनगाव (१७ लाख ११ हजार ५० रुपये), किनगाववाडी (१९ लाख ९२ हजार ९५० रुपये), शेवगा (२५ लाख १२ हजार ३०० रुपये), वाघलखेडा (१४ लाख ८१ हजार रुपये), सारंगपूर (१३ लाख ४६ हजार रुपये), बठाण खु.(११ लाख ५८ हजार ३५० रुपये), नागझरी (१२ लाख १५ हजार ५०० रुपये), दहिपुरी (२४ लाख ३७ हजार ३५० रुपये), बोरी (१२ लाख ९३ हजार २५० रुपये) अशा प्रकारे २१ गावातील शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ९६ लाख १४ हजार ३५० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सावंत यांनी दिली. (वार्ताहर)
६२ हजार शेतकऱ्यांना ३९ कोटी ४१ लाख
आतापर्यंत अंबड तहसील कार्यालयाने पहिल्या टप्प्यात ७६ गावातील ३२ हजार शेतकऱ्यांना १९ कोटी ८७ लाख ३७ हजार १७० रुपये, दुसऱ्या टप्प्यात ४० गावातील २० हजार शेतकऱ्यांना १४ कोटी ५० लाख ६ हजार ६१ रुपये तर तिसऱ्या टप्प्यात २१ गावातील १० हजार शेतकऱ्यांना ४ कोटी ९६ लाख १४ हजार ३५० रुपये अशा प्रकारे तीन टप्प्यात १३७ गावातील ६२ हजार शेतकऱ्यांना ३९ कोटी ४१ लाख ७३ हजार ९३१ रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.