शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

फायलींचा प्रवास होणार जलद गतीने

By admin | Updated: August 13, 2014 01:43 IST

औरंगाबाद : सरकारी कार्यालयांमधील फायलींचा प्रवास आता जलद गतीने होणार आहे.

औरंगाबाद : सरकारी कार्यालयांमधील फायलींचा प्रवास आता जलद गतीने होणार आहे. शासकीय कार्यालयात दाखल फायलींचा निपटारा कमीत कमी वेळेत व्हावा यासाठी शासनाने फायलींच्या प्रवासातील टप्पे कमी केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी याविषयीचा अध्यादेश जारी केला आहे.सरकारी कार्यालयांमध्ये फायलींचा प्रवास वेगवेगळ्या टेबलवरून होत आहे. अनेक वेळा गरज नसताना प्रत्येक स्तरावरू न अधिकारी-कर्मचाऱ्याकडून ही फाईल पुढे सरकत असते. त्यामुळे फायलींच्या निपटाऱ्यात उशीर होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन शासनाने विलंब टाळण्यासाठी फायलींच्या प्रवासातील टप्पे कमी केले आहेत. राज्यात नुकताच ‘शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध नियम २०१३’ तयार करण्यात आला असून तो राज्यात लागू झाला आहे. या नियमानुसार मंत्रालय, तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सादरीकरणाचे टप्पे कमी करण्याबाबत कार्यवाही करणे अपेक्षित आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी जारी केलेल्या अध्यादेशात फाईलींच्या प्रवासातील टप्पे निश्चित केले आहेत. दुय्यम अधिकाऱ्यांकडे सोपविलेल्या अधिकारांची यादी त्वरित प्रसिद्ध करावी, प्रत्येक विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख यांच्या मान्यतेने संबंधित विभाग/कार्यालयाने प्रकरण-फाईल निर्णयार्थ सादर करण्याकरिता तीन स्तर निर्धारित करावेत, अधिकाऱ्यांच्या साखळीमधील अधिकाऱ्यांना फाईल निर्णयार्थ सादर करण्याचे टप्पे कमी करण्यासाठी शक्य तेथे सादरीकरणाकरिता विषय नेमून देण्यात यावेत, अशा सूचनाही यामध्ये करण्यात आल्या आहेत.