शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

थकीत एफआरपीसाठी शेतकऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:39 IST

बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यांपासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) न दिल्याच्या निषेधार्थ तेथील ऊस उत्पादकांनी बुधवारी (८ आॅगस्ट) प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचारी संपामुळे कार्यालय कुलूपबंद असल्याने संतापलेल्या शेतकºयांनी अखेर क्रांतीचौकात धरणे आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देबीडहून आले ऊस उत्पादक : साखर सहसंचालकांच्या कार्यालयाला होते कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यांपासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) न दिल्याच्या निषेधार्थ तेथील ऊस उत्पादकांनी बुधवारी (८ आॅगस्ट) प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचारी संपामुळे कार्यालय कुलूपबंद असल्याने संतापलेल्या शेतकºयांनी अखेर क्रांतीचौकात धरणे आंदोलन सुरू केले.क्रांतीचौकात प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांचे कार्यालय आहे. बीड जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक ऊस उत्पादकांनी या इमारतीत जिन्याच्या पायºयावर बसून आंदोलन सुरू केले. कर्मचारी संपावर असल्याने आज या कार्यालयाचे कुलूप उघडले नाही. प्रादेशिक सहसंचालक एन. व्ही. गायकवाड यादेखील कार्यालयात आल्या नाहीत. साखर कारखानदार आणि सरकारविरोधात ऊस उत्पादकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेतकरी कार्यालयासमोर बसून होते. बीड जिल्ह्यातील शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांनी सांगितले की, माजलगाव येथील जयमहेश शुगर इंडस्ट्रिज, लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना आणि छत्रपती सहकारी, अशा तीन साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपी म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर दिलेला नाही. ही रक्कम सुमारे १५० कोटींपर्यंत आहे. मागील ८ महिन्यांपासून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. हमीभावावर सरकारने तूर, मका खरेदी केला; पण त्याची रक्कम खात्यावर जमा झाली नाही, तसेच कर्जही मिळाले नाही. शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांनी काय करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.या आंदोलनात वसंत सोनवणे, शेख युनूस, गणेश साळुंके, शिवाजी शिंदे, बालाजी फुंडकर, लक्ष्मण भागवत, राजू पठाडे, अशोक गायकवाड, सय्यद पठाण यांच्यासह ऊस उत्पादक हजर होते.जोरदार घोषणाबाजीबीड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी प्रादेशिक सहसंचालकांच्या (साखर) कार्यालयाच्या तीन मजली इमारतीत दिवसभर धरणे आंदोलन केले. ‘ऊस उत्पादकांचे पैसे मिळालेच पाहिजेत’, पैसे आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देण्यात येत होत्या.मुलीचे लग्न जमले, पैसे नाहीत खात्यातनिपाणी टाकळी येथील हनुमाननगरातील रहिवासी गणपत चव्हाण यांनी आपल्या मुलीची लग्नपत्रिका आणली होती. ४ सप्टेंबर रोजी मुलीचे लग्न ठरविले आहे, असे सांगत चव्हाण म्हणाले की, साखर कारखान्यांनी एफआरपी दिला नाही. ८ महिन्यांपासून प्रतीक्षा करीत आहे. मुलीचे पुढील महिन्यात लग्न आहे. बँकेतील खात्यात पैसे जमा झाले नाहीत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagitationआंदोलन