शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

थकीत एफआरपीसाठी शेतकऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:39 IST

बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यांपासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) न दिल्याच्या निषेधार्थ तेथील ऊस उत्पादकांनी बुधवारी (८ आॅगस्ट) प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचारी संपामुळे कार्यालय कुलूपबंद असल्याने संतापलेल्या शेतकºयांनी अखेर क्रांतीचौकात धरणे आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देबीडहून आले ऊस उत्पादक : साखर सहसंचालकांच्या कार्यालयाला होते कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यांपासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) न दिल्याच्या निषेधार्थ तेथील ऊस उत्पादकांनी बुधवारी (८ आॅगस्ट) प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचारी संपामुळे कार्यालय कुलूपबंद असल्याने संतापलेल्या शेतकºयांनी अखेर क्रांतीचौकात धरणे आंदोलन सुरू केले.क्रांतीचौकात प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांचे कार्यालय आहे. बीड जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक ऊस उत्पादकांनी या इमारतीत जिन्याच्या पायºयावर बसून आंदोलन सुरू केले. कर्मचारी संपावर असल्याने आज या कार्यालयाचे कुलूप उघडले नाही. प्रादेशिक सहसंचालक एन. व्ही. गायकवाड यादेखील कार्यालयात आल्या नाहीत. साखर कारखानदार आणि सरकारविरोधात ऊस उत्पादकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेतकरी कार्यालयासमोर बसून होते. बीड जिल्ह्यातील शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांनी सांगितले की, माजलगाव येथील जयमहेश शुगर इंडस्ट्रिज, लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना आणि छत्रपती सहकारी, अशा तीन साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपी म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर दिलेला नाही. ही रक्कम सुमारे १५० कोटींपर्यंत आहे. मागील ८ महिन्यांपासून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. हमीभावावर सरकारने तूर, मका खरेदी केला; पण त्याची रक्कम खात्यावर जमा झाली नाही, तसेच कर्जही मिळाले नाही. शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांनी काय करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.या आंदोलनात वसंत सोनवणे, शेख युनूस, गणेश साळुंके, शिवाजी शिंदे, बालाजी फुंडकर, लक्ष्मण भागवत, राजू पठाडे, अशोक गायकवाड, सय्यद पठाण यांच्यासह ऊस उत्पादक हजर होते.जोरदार घोषणाबाजीबीड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी प्रादेशिक सहसंचालकांच्या (साखर) कार्यालयाच्या तीन मजली इमारतीत दिवसभर धरणे आंदोलन केले. ‘ऊस उत्पादकांचे पैसे मिळालेच पाहिजेत’, पैसे आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देण्यात येत होत्या.मुलीचे लग्न जमले, पैसे नाहीत खात्यातनिपाणी टाकळी येथील हनुमाननगरातील रहिवासी गणपत चव्हाण यांनी आपल्या मुलीची लग्नपत्रिका आणली होती. ४ सप्टेंबर रोजी मुलीचे लग्न ठरविले आहे, असे सांगत चव्हाण म्हणाले की, साखर कारखान्यांनी एफआरपी दिला नाही. ८ महिन्यांपासून प्रतीक्षा करीत आहे. मुलीचे पुढील महिन्यात लग्न आहे. बँकेतील खात्यात पैसे जमा झाले नाहीत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagitationआंदोलन