शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जासाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट !

By admin | Updated: September 10, 2014 00:47 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील बँकांना खरीप पीक कर्ज वाटपासाठी ४८२ कोटींचे उद्दिष्ट दिलेले असताना बँकांनी आजवर ३३७ कोटी ८१ लाख रुपयांचे वाटप केले आहे. आजही १४५ कोटी रूपयांचे

उस्मानाबाद : जिल्ह्यातील बँकांना खरीप पीक कर्ज वाटपासाठी ४८२ कोटींचे उद्दिष्ट दिलेले असताना बँकांनी आजवर ३३७ कोटी ८१ लाख रुपयांचे वाटप केले आहे. आजही १४५ कोटी रूपयांचे वाटप करणे बाकी असल्याचे समोर आले आहे. वारंवार बैठका घेवूनही बँका जिल्हाधिकाऱ्यांना जुमानत नसल्याचे पहावयास मिळत आहे. ऐन पेरणीच्या काळात पावसाने ओढ दिली. तरीही शेतकऱ्यांनी न डगमगता पेरणी उरकली. अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या भरवशावर उसनवारी करून गरज भागविली. परंतु, अर्ज दाखल करूनही कर्ज मिळत नाही, अशी ओरड मागील काही दिवसांपासून होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीही दाखल झाल्या आहेत. बळीराजा या गैरसोयीला तोंड देत असतानाच काही राष्ट्रीयकृत बँकांनी खाजगी नियमापेक्षा जास्त व्याज आकारल्याचेही समोर आले होते. या दुहेरी संकटामुळे बळीराजा अक्षरश: हवालदिल झाला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात ८९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. वेळेवर पेरणी उरकेल, अशी अपेक्षा असतानाच पावसाने ओढ दिली. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरूवातीला सलग तीन-चार दिवस संततधार पाऊस झाला तसेच आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसाने पिकांना जीवनदान मिळाले आहे. दरम्यान, मार्च-एप्रिल महिन्यातील अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असतानाच बँकांकडून कर्ज देण्यासही टाळाटाळ होत असल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. ऐनवेळी पैसा उभा करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना खाजगी सावकाराचे उंबरठेही झिजवावे लागले. वास्तविक पैशाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबू नयेत, या उद्देशाने शासनाने जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी ४८२ कोटी ९४ लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. बँकांकडून यापैकी केवळ ३३७ कोटी ८१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून जवळपास १४१ कोटी रुपयांचे पीक कर्ज अद्यापही वाटप झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अशा बँकांवर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)