शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

हिरवा चारा महागल्याने शेतकरी संकटात

By admin | Updated: July 1, 2014 01:02 IST

कडा : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आष्टी तालुक्यात सध्या हिरव्या चाऱ्याचे दर कमालीचे वाढले आहेत. शेतकऱ्यांकडे चाराच नसल्याने त्यांना चारा विकत घ्यावा लागत आहे.

कडा : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आष्टी तालुक्यात सध्या हिरव्या चाऱ्याचे दर कमालीचे वाढले आहेत. शेतकऱ्यांकडे चाराच नसल्याने त्यांना चारा विकत घ्यावा लागत आहे. परिणामी दुग्धोत्पादनही घटले आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे विकली आहेत. आष्टी तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा फेरा आहे. या तालुक्यात बीड जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो. यामुळे आहे त्या पाण्यावर शेतकऱ्यांना अवलंबून रहावे लागते. या तालुक्यात डोंगराळ भागही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सुपिक जमीन इतर तालुक्यांच्या तुलनेने कमीच आहे. यामुळे आष्टी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करतात. पाणीटंचाई व उन्हाळ्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे हिरव्या चाऱ्यांचाही अभाव आहे. त्यामुळे जनावरांसाठी शेतकऱ्यांना हिरवा चारा विकत घ्यावा लागतो. काही शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे हिरवा चारा जोपासला आहे. हा चारा आता २८०० ते ३ हजार प्रतिटन मिळत आहे. यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च होत असल्याने शेतकरीही अडचणीत आले आहेत. यामुळे काही शेतकऱ्यांनी आपली दुभती जनावरे विकली असल्याचे जिजामाता दुध संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ कर्डीले यांनी सांगितले. गेल्या वर्षी आष्टी तालुक्यात चारा छावण्या उभारल्या होत्या. त्यावेळी तालुक्यात तब्बल तीन ते साडेतीन लाख दुधाचे उत्पादन होत होते. आता हे दुग्धोत्पादन केवळ दीड लाख लिटरवर आले आहे. दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी कडा बाजार समितीच्या आवारातून दररोज २८ ते ३० टन ऊसाची खरेदी करत असल्याचेही दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी व दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी प्रशासनाने गावोगावी पाहणी करून जनावरांसाठी त्वरीत चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी रवि ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. अंकुश तळेकर यांनी केली आहे. प्रशासन म्हणते उपाययोजना करूतालुक्यात सध्या चारा, पाणीटंचाई आहे. यामुळे जनावरांचेही हाल होत आहेत. या संदर्भात तहसीलदार राजीव शिंदे म्हणाले, वरिष्ठांना अहवाल पाठवून उपाययोजना करण्यात येतील. (वार्ताहर)पशुधनाची बेभाव विक्री करू नयेआष्टी तालुक्यात दुग्धोत्पादनासाठी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर दुधाळ जनावरे आहेत.चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांनी आपले पशुधन विक्री करू नये, असे आवाहन माजी आ. साहेबराव दरेकर यांनी केले.