शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्स्प्रेस वे’ झाला खडतर

By admin | Updated: August 2, 2014 01:44 IST

नजीर शेख, औरंगाबाद नागपूर- औरंगाबाद- मुंबई हा जानेवारी १९९९ मध्ये मंजूर झालेला राष्ट्रीय दर्जाचा एक्स्प्रेस रस्ता पंधरा वर्षांनंतरही पूर्ण झालेला नाही.

नजीर शेख, औरंगाबादनागपूर- औरंगाबाद- मुंबई हा जानेवारी १९९९ मध्ये मंजूर झालेला राष्ट्रीय दर्जाचा एक्स्प्रेस रस्ता पंधरा वर्षांनंतरही पूर्ण झालेला नाही. रस्त्याचे काम करण्याची गती पाहता आणखी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. एखादे काम पंधरा वर्षांनंतरही पूर्ण न होणे यातून राज्याच्या रस्ते विकासाची दशा आणि दिशा स्पष्ट होत आहे. नागपूर ते मुंबई हे अंतर कमी करण्याच्या हेतूने तसेच नागपूर, अमरावती, नाशिक, मुंबई या महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून नागपूर- औरंगाबाद- मुंबई हा ‘एक्स्प्रेस वे’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाची सुरुवातही मोठा गाजावाजा करून झाली. नागपूर ते मुंबई अंतर ५० कि. मी. ने कमी करण्याचे उद्दिष्ट या रस्त्याची योजना मार्गी लावताना ठेवण्यात आले. १९९९ मध्ये या रस्ते कामाला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात रस्त्याचे काम २००२ मध्ये सुरूझाले. २०१५ अखेर हा रस्ता पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र २०१४ पर्यंत केवळ ५० टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे २०१५ अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची खात्री देता येत नाही. चौपदरी पूर्ण रस्ता केव्हा होणार याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देता येत नाही. अजून तीन ते चार वर्षांचा कालावधी लागेल, असे औरंगाबादमधील राज्य रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणेआहे. राज्य रस्ते महामंडळाची उदासीनता आणि राजकीय व वाहतूक क्षेत्राकडून आग्रह न झाल्याने या रस्त्याच्या कामाचा पुरता बोऱ्या वाजला आहे.राज्याच्या तीन महत्त्वाच्या शहरांसह मराठवाडा तसेच विदर्भाला मुंबईशी वेगाने जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने मराठवाडा आणि विदर्भावर अन्यायच झाला आहे. नागपूर ते बुटीबोरी, जालना ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते लासूर स्टेशन या तीन टप्प्यांचेच फक्त चौपदरीकरण झाले आहे. इतर ठिकाणी हा रस्ता दुहेरीच आहे. अनेक ठिकाणी छोट्या छोट्या पुलांची कामे बाकी आहेत. विदर्भातील कारंजा, सिंदखेडराजा आणि मराठवाड्यातील वैजापूर या परिसरात हा रस्ता अनेक कि. मी. अजूनही एकेरीच आहे. असे असूनही या रस्त्यावर शहर विकासाच्या नावावर टोल सुरू करून राज्य शासनाने एकप्रकारे जनतेची लूटच चालविल्याचा हा प्रकार आहे.दोन तासांचा अवधी कमी होणारनागपूर ते मुंबई असा हा मार्ग राज्याच्या १२ जिल्ह्यांतून जातो. हा राज्यमार्गच आहे; परंतु याचा दर्जा राष्ट्रीय महामार्गाचा आहे. नागपूर - मुंबई हे अंतर ५० कि. मी. ने कमी होणार असले तरी हा रस्ता चौपदरी (फोर लेन) असल्याने वाहनांना वेगाने अंतर कापणे शक्य होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ पेक्षा या रस्त्याने सुमारे दोन तासांचा अवधी कमी लागणार आहे. मात्र, हा उद्देश अद्यापपर्यंत सफल झालेला नाही. १९९८ साली राज्य रस्ते महामंडळाने ‘मुंबई - पुणे या एक्स्प्रेस वे’ चे घेतलेले काम २००२ साली पूर्ण झाले.याठिकाणी वेगाने काम झाले. २००५ साली ‘मुंबई - नाशिक या एक्स्प्रेस वे’ चे काम सुरू होऊन व दोन वेळा मुदतवाढ मिळूनही २०१३ साली जवळपास पूर्ण झाले.या दोन रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण पाहता या रस्त्यांचे काम वेगाने होणे गरजेचे होते. असे असले तरी राज्यातील सर्वात जास्त लांबीच्या (सुमारे ७०० कि. मी.) आणि मराठवाडा (१६० कि. मी.) व विदर्भातून (४०० कि. मी.) जाणाऱ्या मार्गाबाबत प्रशासकीय यंत्रणेसह सगळीकडेच उदासीनता असल्याने या रस्त्याचे काम पंधरा वर्षांनंतरही पूर्ण होऊ शकले नाही. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी यासाठी जमिनी दिल्या त्यांची फसवणूक झाली आहे.असा आहे मार्ग-नागपूर- बुटीबोरी, वर्धा, पुलगाव, कारंजा (लाड), जालना, औरंगाबाद, वैजापूर, सिन्नर, घोटी, इगतपुरी आणि पुढे कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ ला मिळतो) मुंबई. कोणाला फायदा?या ‘एक्स्प्रेस वे’चा बुटीबोरी, वर्धा, जालना, शेंद्रा, वाळूज, सिन्नर या औद्योगिक वसाहतींना फायदा होणार आहे. याशिवाय सेवाग्राम, लोणार, सिंदखेडराजा, वेरूळ, शिर्डी या धार्मिक आणि पर्यटन केंद्रांनाही याचा फायदा होणार आहे.मात्र, हा रस्ताच अद्याप पूर्ण न झाल्याने या औद्योगिक वसाहती व पर्यटन केंद्रांना याचा फायदा मिळालेला नाही.