शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
5
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
6
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
7
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
8
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
9
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
12
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
13
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
14
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
15
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
17
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
18
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
19
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
20
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षानंतरही महिलेस धनादेश मिळेना

By admin | Updated: September 12, 2014 00:24 IST

जालना : घनसावंगी तालुक्यातील नांदी येथील एका महिलेवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचा प्रकार पाच वर्षांपूर्वी घडला

जालना : घनसावंगी तालुक्यातील नांदी येथील एका महिलेवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचा प्रकार पाच वर्षांपूर्वी घडला. मात्र अद्यापही सदर महिलेस जिल्हा परिषदेकडून मदतीचा धनादेश मिळेनासा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर प्रदीर्घ काळ चर्चा होऊनही जि.प. आरोग्य विभागाने अनास्था दाखविली आहे.नांदी येथील यमुनाबाई पांडुरंग माळी यांच्यावर ११ नोव्हेंबर २००९ रोजी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाली. मात्र ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाली. शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यानंतर महिलेस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदर विमा कंपनीकडून मदत मिळणे अपेक्षित आहे. शासनाच्या निर्णयानुसार अशा प्रकरणात ३० हजार रुपयांची आर्थिक मदत देणे बंधनकारक आहे. परंतु जिल्हा परिषदेने याबाबत फारसे गांभीर्य न घेतल्याने पाच वर्षानंतरही सदर महिलेस मदत मिळालेली नाही. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर महिलेस धनादेश देण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे ९ सप्टेंबर रोजीच्या स्थायी समिती बैठकीत म्हटले होते.याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.एम. भटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, यमुनाबाई माळी यांना कुटुंब कल्याण विमा योजनेअंतर्गत संबंधित विमा कंपनीकडून उशिराने प्राप्त झालेला ३० हजार रुपयांचा धनादेश मुदत संपण्यापूर्वी दहा दिवस अगोदर देण्यात आला. ४सदरील लाभार्थीने धनादेश बँकेत न वटविता मुदत संपल्यानंतर या कार्यालयास परत केल्यामुळे नूतनीकरणासाठी धनादेश विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. सदर धनादेश प्राप्त होण्यास विलंब होत असल्यामुळे माळी यांना विमा कंपनीकडून प्राप्त होणारा संभाव्य धनादेश जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जालना यांचेकडे जमा करण्याच्या लेखी हमी पत्र घेण्याच्या अटीवर धनादेश देण्यात येत आहे. हा धनादेश ११ सप्टेंबर रोजी दुपारी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.