शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

‘नगर भूमापन’ च्या स्थापनेला मुहूर्त मिळेना

By admin | Updated: November 5, 2014 00:57 IST

संजय कुलकर्णी , जालना उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाअंतर्गत नगर भूमापन कार्यालय स्थापनेसाठी शासनाने १७ कर्मचाऱ्यांच्या स्टाफला सुमारे एक-दीड वर्षांपूर्वीच मंजुरी दिली

संजय कुलकर्णी , जालनाउपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाअंतर्गत नगर भूमापन कार्यालय स्थापनेसाठी शासनाने १७ कर्मचाऱ्यांच्या स्टाफला सुमारे एक-दीड वर्षांपूर्वीच मंजुरी दिली. परंतु अद्यापही या कार्यालयाची स्थापना न झाल्याने शहरातील मालमत्ताधारकांची कामांसाठी मोठी ससेहोलपट होत आहे.येथील प्रशासकीय इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील जागेचे मोजमाप, नामांतर, नक्कलची प्रत देणे, खरेदीचे व वाटणी फेर देणे इत्यादी कामे या कार्यालयामार्फत होतात. कार्यालय प्रमुखांकडे अंबड तालुक्याचाही अतिरिक्त पदभार आहे. तीन हजार मालमत्ताधारकांच्या मागे एक परिरक्षण भूमापक असणे आवश्यक आहे. परंतु या कार्यालयात केवळ ३ परिरक्षण भूमापक कार्यरत आहेत.शहरात ५८ हजार मालमत्ताधारक आहेत. त्यामुळे परिरक्षण भूमापकांची संख्या अधिक असणे गरजेचे आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी भूमी अभिलेख कार्यालयाने शासनाकडे नगरभूमापन कार्यालयाच्या स्वतंत्र कार्यालयासाठीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी आवश्यक स्टाफच्या संख्येचाही त्यात समावेश होता. त्यानुसार शासनाने एक-दीड वर्षांपूर्वीच स्टाफला मंजुरी दिल्याचे समजते. त्यात नगर भूमापन अधिकारी, ९ परिरक्षण भूमापक, २ मोजणी अधिकारी, ५ शिपाई यांचा समावेश आहे. याबाबत जिल्हा भूमीअभिलेख अधीक्षक इंदलकर यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, नगर भूमापन कार्यालयाच्या स्वतंत्र कार्यालयासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. परंतु स्टाफ मंजुरीचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत.उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात दोन-तीन अपवाद वगळता अधिकारी, कर्मचारी गैरहजर आढळतात. याबाबत स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतरही फारसा परिणाम झालेला नाही. लोकांची कामे या कार्यालयात लवकर होत नाहीत. ४अनेकवेळा चकरा मारून देखील उपयोग होत नसल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी काही व्यक्तींनी या कार्यालयात कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला होता.