शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
पंतप्रधानांच्या आदेशाला भाजप नेत्यांकडून केराची टोपली; दुसऱ्याच दिवशी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
5
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
6
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
7
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
8
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
10
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
11
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
13
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
14
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
15
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
16
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
17
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
18
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
19
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
20
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणे जमीनदोस्त

By admin | Updated: June 24, 2014 00:43 IST

परभणी: परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील रेल्वेस्टेशन, न्यायालय परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली.

परभणी: परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील रेल्वेस्टेशन, न्यायालय परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली.
२३ जून रोजी सकाळी ६.३० वाजता महापालिकेच्या वतीने अतिक्रमण उठविण्यास सुरुवात करण्यात आली. आयुक्त अभय महाजन यांनी २१ जून रोजी या संदर्भात बैठक घेऊन उपायुक्त दीपक पुजारी, रणजीत पाटील, प्रभाग समिती ब चे अशोक पाटील, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, राजू झोडपे यांना अतिक्रमणे काढून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. परिसरातील २५ कच्ची दुकाने, दोन पक्की दुकाने, आठ पानपट्ट्या पाडण्यात आल्या. पोलिस उपाधीक्षक प्रणय अशोक यांच्या नियंत्रणाखाली पोलिस पथक कार्यरत होते. दंगा नियंत्रण पोलिस पथक, स्वच्छता विभागाचे कर्मचारी दिमतीला होते. जेसीबी मशीनद्वारे अतिक्रमण काढण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नागेश जोशी, मेहराज अहेमद, के. बी. हैबते, गणेश लहाने, राजकुमार जाधव, विद्युत विभागाचे शेख महेबुब हे देखील उपस्थित होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत मीटर काढण्यासाठी मदत केली.
अनाधिकृत अतिक्रमणे पूर्णपणे काढून घेण्यात आली आहेत. पोलिस उपअधीक्षक प्रणय अशोक यांनी या ठिकाणी स्वत: उपस्थित राहून अतिक्रमणे काढून घेण्यास भाग पाडले. शहरात अनधिकृत अतिक्रमणे कोणीही करु नयेत, तसा प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रशासन व महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहा महिन्याखाली अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्या अतिक्रमण मोहिमेस जनतेतून पाठिंबा मिळत होता. बरीच अतिक्रमणे यावेळी काढण्यात आली. परंतु, त्यानंतर राजकीय दबावामुळे ही मोहीम थंड झाली. निवडणुका संपल्यानंतर मोहीम पुन्हा सुरु होणार असल्याचे सुतोवाच जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. जनतेतून या मोहिमेचे स्वागत होत आहे.
वीस वर्षापासून होती अतिक्रमणे
महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेली अतिक्रमणे ही मागील वीस वर्षापासूनची होती. महानगरपालिकेने तातडीने ही करवाई केली व जुनी अतिक्रमणे हटविली. ही मोहीम पुढे अशीच चालू रहावी, अशी अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त होत आहे. शहराच्या सर्वच भागात अतिक्रमणांचे प्रकार वाढले आहेत. दरवर्षी ही कारवाई होते. पाठोपाठ अतिक्रमणधारक पुन्हा त्या जागेवर कब्जा करतात. कारवाई पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये, याची दक्षताही महानगरपालिकेने घेणे गरजेचे आहे. अन्यथा हा केवळ वार्षिक उपक्रमच ठरु शकतो.