शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

औरंगाबाद छावणीतील गॅस्ट्रोच्या साथीस परिषदेतील कर्मचारीच जबाबदार; सत्यशोधन समितीचा निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 7:32 PM

नोव्हेंबर महिन्यात दूषित पाण्यामुळे छावणीतील हजारो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेसंदर्भात नेमण्यात आलेल्या सत्यशोधन (फॅक्ट फाइंडिंग) समितीच्या अहवालावर आज ‘बंदद्वार’ (इनकॅमेरा) बैठकीत प्रदिर्घ चर्चा झाली. यात छावणी परिषदेच्या कर्मचा-यांच्या चुकीमुळेच ही साथ पसरल्याचा सकृतदर्शनी निष्कर्ष काढण्यात आला आहे.

ठळक मुद्दे नोव्हेंबर महिन्यात दूषित पाण्यामुळे छावणीतील हजारो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने खळबळ उडाली होतीपरिषदेने या घटने संदर्भात उपाध्यक्ष संजय गारोल यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती नेमली होती. समितीने छावणी परिषदेच्या कर्मचा-यांच्या चुकीमुळेच ही साथ पसरल्याचा सकृतदर्शनी निष्कर्ष काढण्यात आला आहे.

औरंगाबाद : नोव्हेंबर महिन्यात दूषित पाण्यामुळे छावणीतील हजारो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेसंदर्भात नेमण्यात आलेल्या सत्यशोधन (फॅक्ट फाइंडिंग) समितीच्या अहवालावर आज ‘बंदद्वार’ (इनकॅमेरा) बैठकीत प्रदिर्घ चर्चा झाली. यात छावणी परिषदेच्या कर्मचा-यांच्या चुकीमुळेच ही साथ पसरल्याचा सकृतदर्शनी निष्कर्ष काढण्यात आला आहे.   

छावणी परिषदेतील हजारो नागरिक नोव्हेंबरमध्ये गॅस्ट्रोच्या साथीने बाधित झाले होते. यानंतर हे प्रकरण विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही गाजले होते. परिषदेने या घटने संदर्भात उपाध्यक्ष संजय गारोल यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती नेमली होती. समितीमध्ये नगरसेवक किशोर कच्छवाह , एजीई कर्नल  शर्मा, आनंद शर्मा आणि परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर हे सदस्य होते. सविस्तर चौकशीअंती त्यांनी अध्यक्षांकडे अहवाल सोपविला होता. त्यावर आजच्या बैठकीत प्रदिर्घ चर्चा झाली.

याशिवाय छावणीतील ५ वार्डातील अंतर्गत जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय आणि इतर प्रशासकीय निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले. बैठकीस उपाध्यक्ष संजय गारोल, नामित सदस्य एजीई कर्नल शर्मा, तसेच सदस्य प्रशांत तारगे, किशोर कच्छवाह, पद्मश्री जैस्वाल, शेख हनीफ शेख इब्राहीम,मिर्जा रफतुल्ला बेग आणि प्रतिभा काकस उपस्थित होते. सीईओ नायर यांनी कार्यवाहीची नोंद घेतली. त्यांना ओएस वैशाली केनेकर यांनी सहकार्य केले.

या बाबी आहेत अहवालात घटना घडली तेंव्हा परिषदेकडे तांत्रिक कर्मचारी नव्हते. जे कर्मचारी होते, ते प्रशिक्षीत नव्हते. शिवाय कोणत्या कर्मचार्‍याचे काय कर्तव्य अथवा जबाबदारी आहे याबाबत परिषदेने कोणालाही पत्र किंवा मार्गदर्शन केले नसल्याचेही निदर्शनास आले. एखादा कर्मचारी रजेवर जाताना त्याचा कार्यभार दुसर्‍या कर्मचार्‍याला सोपवीत नाहीत. रेल्वे स्थानकाजवळील ‘स्लीव्हज व्हॉल्व’ वेळेवर दुरुस्त केला गेला नव्हता. छावणी परिषदेने महापालिकेला छावणीच्या हद्दीत नदीमध्ये मलनि:स्सारण (ड्रेनेज) वाहिन्या टाकण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले. मात्र, त्यांच्या त्या कामावर देखरेख केली नाही. महापालिकेने ड्रेनेजचे घाण पाणी उघड्यावरच सोडलेले होते. तसेच साठवण टाकी (सम्प) आणि जलकुंभाची साफसफाई केली नव्हती, या व इतर बाबी बैठकीतील प्रदिर्घ चर्चेत निदर्शनास आल्या. 

कायदेशीर सल्ला घेणार परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या चुकीमुळेच गॅस्ट्रोने हजारो लोक बाधीत झाल्याचा सकृदर्शनी निष्कर्ष अहवालातून निघाला आहे. मात्र, संबंधीतांवर काय कारवाई करावी, यासंदर्भात कायदेशीर सल्ला आणि योग्य ती प्रक्रिया पुर्ण करुनच येत्या १०-१५ दिवसात ठरविले जाईल, असे अध्यक्ष ब्रिगेडियर पात्रा यांनी बैठकीत जाहीर केल्याचे उपाध्यक्ष संजय गारोल आणि इतर नगरसेवकांनी पत्रकारांना सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यchavaniछावणीAurangabadऔरंगाबाद