शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या..!

By admin | Updated: September 9, 2014 23:58 IST

हिंगोली : शेतकऱ्यांना बांधावरच आधुनिक तंत्रज्ञान मिळावे, या कृषी चिकित्सालयाच्या मूळ उद्देशालाच कृषी विभागाने हारताळ फासला.

हिंगोली : शेतकऱ्यांना बांधावरच आधुनिक तंत्रज्ञान मिळावे, या कृषी चिकित्सालयाच्या मूळ उद्देशालाच कृषी विभागाने हारताळ फासला. गतवर्षी लाखो रूपये खर्च करूनही ३०० एकरात २८६ क्विंटलाचे नाममात्र उत्पादन निघाले. आजघडीला चिकित्सालयाच्या जमिनीत सध्याचे तण पाहता यंदाही ‘दिव्याखाली अंधार म्हणण्याची वेळ’ उद्भवण्याची शक्यता नकारता येत नाही. परिणामी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कृषी विभागाचीच ही बोंब असेल तर इतरांनी त्यांचे सल्ले ऐकले तर ‘आमदनी अठन्नी खर्चा रूपया’ ही बोंब होईल.देशाची अर्थव्यवस्था प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून असल्याने कृषी विभागाला अन्यन्य साधारण महत्व प्राप्त झाले. स्थानिक ठिकाणीच उत्पादकांना शेतीबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी जिल्हा कृषी विभागात शेतकऱ्यांच्या राबता असतो. याहीपुढे जाऊन शासनाने उत्पादकांना बांधावरच तंत्रज्ञान मिळावे, या उद्धेशाने कृषी चिकित्सालयाची स्थापना केली. जिल्ह्यात त्यानुसार हिंगोली, बासंबा, आखाडा बाळापूर, वसमत आणि गोळेगावात चिकित्सालयाच्या जमिनी आहेत. त्यावर विविध प्रात्यक्षिके करता यावीत, अधिकाऱ्यांना स्व अनुभव घेऊन तो शतेकऱ्यांना सांगता यावा, अधिकाअधिक उत्पादन काढून उत्पादकांना दाखविता यावे, शेतकऱ्यांनाही ते उघड्या डोळ्याने पाहता यावे आणि त्यातून बियाणे तयार करण्यासाठी उत्पादनही घेता यावे, या उद्देशासाठी या जमिनी महत्त्वाच्या आहेत; परंतु यातील एकही उद्देश साध्य होताना दिसत नाही. मागील वर्षी केवळ २८६ क्विंटल उत्पादन ३०० एकरात निघाले. एकाही ठिकाणी समाधानकारकच नव्हे तर सांगण्याजोगाही उतार आलेला नाही. हरभऱ्याचे एकूण उत्पादन ३ क्विंटल झाल्याची नोंद कृषी विभागात सापडते. पैैशांची, तंत्रज्ञानाची आणि वेळेची कमतरता नसतानाही प्रत्येक ठिकाणी तणाने शेत खाल्ले. बहुतांश अधिकाऱ्यांचे परजिल्ह्यातून अपडाऊन असल्याने बाहेरगावच्या ठिकाणची पिके पाहण्यासाठी कदाचित अधिकाऱ्यांना वेळ नसवा; पण जिल्हा कार्यालयाच्या पाठीमागील पीकही त्यांना दिसत नाही, हे विषेश. (वार्ताहर)जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी हे काम पाहतात म्हणून त्यांच्याकडे बोट दाखविले. तद्नंतर उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी बाहेरगावी असून गत वर्षी नव्हतो, म्हणून हात वर केले.