शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

डमी बातमी : आरटीई प्रवेश संकटात, दोन वर्षांपासून शासनाकडून छदामही मिळालेला नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST

आरटीई निधीतील ६६ टक्के रक्कम केंद्र सरकारकडून मिळत असते तर ३४ टक्के रक्कम राज्य शासनाकडून मिळत असते. मागील ...

आरटीई निधीतील ६६ टक्के रक्कम केंद्र सरकारकडून मिळत असते तर ३४ टक्के रक्कम राज्य शासनाकडून मिळत असते. मागील दोन वर्षांपासून एक रुपयाही संस्थाचालकांना मिळालेला नसून २०१८-१९ यावर्षीचीही निम्मी रक्कम मिळणे बाकी आहे. यामुळे मग शाळाही आरटीई प्रवेश देण्यासाठी नापसंती दर्शवित असून, यामुळे विनाकारण गरजू घरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

यावर्षी कोरोनामुळे शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्याच नाहीत. त्यामुळे इयत्ता पहिली किंवा बालवर्गात मोजकेच प्रवेश झाले. शिक्षण विभागाने तीच संख्या ग्राह्य धरून परस्पर त्याच्या २५ टक्के प्रवेश शाळांना आरटीईसाठी ऑनलाइन पाठवून दिले. ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत निम्यापेक्षा कमी आहे़. त्यामुळे यावर्षी किमान ५० हजार विद्यार्थी तरी आरटीई प्रवेशासाठी मुकतील, असे मेसा संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी सांगितले.

चौकट :

जिल्ह्यातील आरटीई नोंदणीकृत शाळा- ६७५

आरटीईअंतर्गत झालेले प्रवेश

१. २०१८- १९- ३,६९७

२. २०१९- २०- ४०२८

३. २०२०- २१- ४११६

चौकट :

पाठपुरावा सुरू

केंद्र सरकारकडूनच आरटीईसाठीचा निधी आलेला नाही. दुसरे म्हणजे कोरोनामुळे सध्या शासनाचीही आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने पगार आणि अत्यावश्यक कामांवर निधी खर्च करण्यात येत आहे. आमचा पाठपुरावा सुरूच आहे. शासनाकडून निधी आला की, लगेचच त्याचे वाटप होईल.

- सूरजप्रसाद जैस्वाल, शिक्षणाधिकारी.

चौकट :

१. २०१८- १९ मध्ये किती मिळाले-

गेल्या तीन वर्षांपासून शासनाने आरटीई २५ टक्के प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी असणारी जवळपास ४०० कोटींपेक्षा अधिक रक्कम थकविली आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या शाळांना दिलासा मिळणे गरजेचे आहे. २०१८- १९ यावर्षी नियोजित रकमेच्या केवळ ५० टक्के रक्कम मिळाली आहे, असे संस्थाचालकांनी सांगितले.

२. २०१९- २० मध्ये किती मिळाले-

२०१९-२० हे वर्ष संस्थाचालकांसाठी अतिशय कष्टदायी गेले. या काळात आरटीई प्रवेशासाठी शासनाकडून एकही रुपया आलेला नाही. २०१९-२०२० यावर्षीची १०० टक्के रक्कम मिळणे बाकी आहे.

३. २०२०- २१ यावर्षी किती मिळाले-

आरटीईअंतर्गत शासनाकडून २०२०-२१ या वर्षीसाठी काहीही निधी मिळालेला नाही. यामुळे अनेक शाळांकडून आरटीई प्रवेशासंदर्भातील उद्दिष्ट पूर्ण करण्यास टाळाटाळ होत आहे. ही योजना आहे की, दिखावा अशी शंका येते, असे प्रल्हाद शिंदे यांनी सांगितले.