शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

हास्ताक्षर बदललेल्या ३७२ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे वितरण, शिक्षण मंडळाचा निर्णय

By राम शिनगारे | Updated: June 23, 2023 21:57 IST

ग्रामीण पोलिसांचा शिक्षक आरोपींचा शोध सुरूच

छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेला बसलेल्या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये हस्ताक्षर बदलण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे मंडळाने या विद्यार्थ्यांनी जेवढी उत्तरे लिहिली होती. त्या उत्तरानुसार निकाल जाहीर करीत गुणपत्रिकांचे वितरण थांबविण्यात आले होते. मात्र, पोलिसांना अद्याप आरोपी शिक्षक सापडले नाहीत. त्यातच संबंधित विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मंडळाने ३७२ गुणपत्रिकांचे वाटप केल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली.

शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचा तपासणीचा प्रवास केंद्रप्रमुख, कस्टोडियन, मॉडरेटर, मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य ते शिक्षक असा होता. उत्तरपत्रिका तपासल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने परत मंडळात येतात. यावर्षी बारावीच्या परीक्षेला १ लाख ७५ हजारहून अधिक विद्यार्थी बसले होते. बीड, अंंबाजोगाई, कान्होळा, पैठण या ठिकाणच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घनवट आणि पिंपळा येथील शिक्षक राहुल भंगवान ऊसारे आणि मनिषा भागवत शिंदे यांच्याकडे पाठविल्या होत्या. १३ मार्च रोजी उत्तरपत्रिका तपासून जमा करणे अपेक्षित असतांना वारंवार मंडळाने सांगूनही ८ एप्रिल रोजी त्या जमा करण्यात आल्या. तेव्हा मॉडरेटरने तपासणी केल्यानंतर त्या उत्तरपत्रिकांमध्ये हस्ताक्षर बदलल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शिक्षकांवर फर्दापुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणात मंडळाने विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरांची तपासणी करून त्यांचा निकाल जाहीर केला होता. मात्र, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नव्हत्या. त्या गुणपत्रिका मागील दोन दिवसांत विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.

शिक्षण मंडळाने केले हात वर
मंडळाने गुणपत्रिका संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांकडे पाठविलेल्या नव्हत्या. त्यामुळे महाविद्यालयांनी त्याचे वितरण विद्यार्थ्यांना केले नव्हते. मात्र निकालास २४ दिवस उलटून गेले आहेत. विद्यार्थ्यांचे पुढील वर्षातील निकाल रखडल्यामुळे मंडळाचे गुणपत्रिका महाविद्यालयात पाठवून दिल्या. त्याचे वाटप मागील दोन दिवसात झाले आहे. याविषयी मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना विचारले असता, त्यांनी मंडळाकडे गुणपत्रिकाच नव्हत्या. निकाल लागला तेव्हाच सर्वासोबतच त्या गुणपत्रिका संबंधितांच्या शाळांमध्ये पाठविल्याचे सांगितले. त्यामुळे या गुणपत्रिका नेमक्या कुणी आणि कुठे आडवून ठेवल्या होत्या, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षा