शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
3
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
4
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
5
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
6
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
7
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
8
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
9
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
10
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
11
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
12
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
13
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
14
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
15
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
16
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
17
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
18
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
19
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
20
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हेगारीत औरंगाबाद शहर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

By admin | Updated: April 28, 2016 00:16 IST

औरंगाबाद : आशिया खंडात झपाट्याने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. परंतु याबरोबरच गुन्हेगारीही या शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

औरंगाबाद : आशिया खंडात झपाट्याने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. परंतु याबरोबरच गुन्हेगारीही या शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार औरंगाबाद शहर हे सायबर क्राईममध्ये राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१५ मध्ये शहरात १४८ सायबर गुन्हे घडल्याची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे कार्ड फ्रॉडचे असल्याची माहिती सायबर क्राईम विभागाने दिली.
तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पोलिसांकडून जनजागृती करून कोणतीही घट त्यामध्ये होण्यास तयार नाही. यासंदर्भात सीआयडीने जानेवारी महिन्यात एक अहवाल जाहीर केला. त्यामध्ये मुंबई शहर प्रथम क्रमांकावर तर औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर आहे. बिहार, झारखंड, प. बंगाल, ओरिसा, दिल्ली येथील काही जिल्ह्यांतून यासंबंधीचे फोन येतात. बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगतात. तुमचे क ार्ड ब्लॉक किंवा नवीन कार्ड द्यावयाचे आहे, असे बोलून सर्व माहिती विचारून घेतली जाते. ही माहिती घेतल्यानंतर काही वेळातच आॅनलाईन फसवणूक होते. तसेच एखादी महिला किंवा तरुणीच्या नावाने फेसबुकचे फेक अकाऊंट तयार करून, बदनामी केले जाते. क्रेडिट, डेबिट कार्ड फसवणुकीचे प्रमाणही खूप मोठे आहे.
इंडस्ट्रीला मोठा आर्थिक फटका
कॉर्पोरेट कंपन्यांचे अकाऊंट हॅक करून, ई-मेल फिशिंग अटॅक केला जातो. त्यामुळे इंडस्ट्रीला मोठा आर्थिक फटका बसतो. औरंगाबाद शहरात असे विविध सायबर गुन्हे वाढत आहेत.
ते असे-२०११ मध्ये २४, २०१२ -३१, २०१३-४७, २०१४ -६६ अशा सायबर गुन्ह्यांची नोंद पोलिसांकडे आहे.
तर २०१५ मध्ये यामध्ये मोठी वाढ होऊन १४८ गुन्हे घडले. त्यामध्ये ८८ हे कार्ड फ्रॉडचे गुन्हे आहेत.
वैयक्तिकमाहिती देऊ नये
कोणतीही बँक फोनवर किंवा ई-मेलवर कधीच माहिती मागवीत नाही. त्याकरिता नागरिकांनी आपल्या कार्डची माहिती फोनवर देणे टाळावे. तरुणांना आॅनलाईन नोकरीची आॅर्डर पाठविली जाते. त्याची खात्री केल्याशिवाय कोणताच आर्थिक व्यवहार करू नये. नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. -राहुल खटावकर,
सहायक पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम