शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
4
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
5
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
6
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
7
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
8
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
9
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
10
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
11
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
12
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
13
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
16
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
17
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
19
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
20
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
Daily Top 2Weekly Top 5

खर्च सात कोटींचा वृक्ष मात्र सातशेच

By admin | Updated: June 22, 2014 00:23 IST

विजय चोरडिया, जिंतूर तालुक्यात मागील वर्षी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला बहर आला होता़ सुमारे साडेचार लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य प्रशासनाच्या कागदावर असले तरी आज मात्र साडेचार हजार झाडेही

विजय चोरडिया, जिंतूर
तालुक्यात मागील वर्षी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला बहर आला होता़ सुमारे साडेचार लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य प्रशासनाच्या कागदावर असले तरी आज मात्र साडेचार हजार झाडेही तालुक्यात दिसत नाहीत़ प्रशासनाने मात्र सात कोटीपेक्षा जास्त रक्कम वृक्ष लागवडीवर खर्च केल्याचे दिसते़ प्रत्यक्षात मात्र १ लाख ४१ हजार झाडे लावल्याचा प्रशासनाचा दावा आहे़
वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद, वन विभाग व तालुका प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आला़ या कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी तालुक्यात दिलेल्या उद्दिष्टांपैकी साडेचार लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे प्रशासनाने कागदोपत्री दाखविले आहे़ वैयक्तिक लाभाच्या या योजनेनुसार एका लाभार्थ्याला कुशल व अकुशल मिळून ५० हजार रुपयापर्यंत लाभ मिळतो़ यामध्ये खड्डे खोदणे, वृक्ष लावणे व त्याचे संगोपन यांचा समावेश आहे़ तीन वर्षे टप्प्या टप्प्याने हे अनुदान मिळत असते़ तालुक्यातील १७० गावांत सुमारे २ हजारापेक्षा जास्त लाभार्थी या योजनेत आहेत़ परंतु, प्रत्यक्षात १० टक्क्यापेक्षा कमी लाभार्थ्यांनी वृक्ष लागवड केली आहे़ कागदोपत्री मोजमाप पुस्तिका तयार करून ग्रामरोजगार सेवक व संबंधित अभियंता यांना हाताशी धरून शासनाच्या लाखो रुपयांचा अपव्यय संबंधितांनी केला आहे़ यामध्ये स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी यांचाही समावेश आहे़ या सर्व प्रकाराला तालुका प्रशासनाचे खतपाणी आहे़ शासन एकीकडे वृक्ष लागवडीसारखा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेऊन पर्यावरण विकास करण्याचा प्रयत्न करीत असताना प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही योजनाच संपविण्याचे कारस्थान काही प्रशासनातील अधिकारी, गुत्तेदार व संबंधितांकडून होत आहे़ तालुक्यामध्ये सन २०१३-१४ मध्ये ७ कोटी रुपये वृक्ष लागवडीवर खर्च झाले़ परंतु, ही वृक्ष जागेवर आहेत का? हे न उलगडणारे कोडे आहे़ म्हणूनच की काय प्रशासनाने यावर्षी आराखड्यातही वृक्ष लागवडीसारख्या पर्यायाला जास्तीत जास्त स्थान दिले आहे़ परिणामी वृक्ष न लावताही लाखो रुपयांचा निधी लाटण्याचे कारस्थान यंत्रणेकडून होत आहे़ या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे़, तरच खऱ्या अर्थाने जिल्हा प्रशसनाचा वृक्ष लागवडीचा उपक्रम सामाजिक उपक्रम म्हणून समाजोपयोगी पडेल़
नियम डावलून कामांना मंजुरी
शासन निर्णयानुसार महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची कामे वाटप करीत असताना ज्या गावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त कामे सुरू आहेत, अशा गावांत नवीन कामे देता येत नाहीत़ परंतु, जिंतूर तहसील कार्यालयाने नियम धाब्यावर बसवून एकाच गावामध्ये एकाच वेळी दहा ते पंधरा कामांना मंजुरी दिली़ जी की शासनाच्या नियमाचा भंग करणारी आहे़ अनेक गावांमध्ये पाचपेक्षा जास्त कामे अपूर्ण अवस्थेत आहेत़ त्या ठिकाणी ती कामे पूर्ण झाल्याशिवाय नवीन काम देता येत नाही़ परंतु, मोठी आर्थिक उलाढाल करून अनेक गावांमध्ये अशा कामांना तालुका प्रशासनाने सहज मंजुरी दिल्याचा आरोप होत आहे़
बाहेरच्या गुत्तेदारांचे जिंतूर तालुक्यात काम
रोजगार हमी योजनेच्या माती नाला बांध, सिमेंट बंधारे, पाझर तलाव, नाला सरळीकरण आदी कामे परभणी, मंठा, जालना या भागातील गुत्तेदारांनी केले आहेत़ राजकीय कार्यकर्त्यांसोबत भागीदारी करून निकृष्ट दर्जाचे काम या भागात करण्यात आले़
मजुरांच्या यादीत बालकांचा समावेश
रोजगार हमीच्या कामात मजूर यादीमध्ये अनेक गावांत स्वत:चे नातेवाईक, धनदांडगे यांचा समावेश आहे़
काही ठिकाणी बालकामगारांनाही मजूर दाखविण्यात आले़ विशेष म्हणजे भोसी, पिंपळगाव, इटोली, साईनगर तांडा आदी ठिकाणी तर मयतांचे नावेही मजूर यादीत असल्याची माहिती समोर आली आहे.
हा सर्व प्रकार प्रशासनाच्या सहकार्यामुळेच झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते़ विशेष म्हणजे, अशाच एका प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तालुका प्रशासनाला कानपिचक्या दिल्याचे समजते़