शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विकासासाठी रेल्वेस्टेशनची निवड

By admin | Updated: December 8, 2015 00:10 IST

औरंगाबाद : औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन हे दक्षिण मध्य रेल्वेमधील महत्त्वाचे रेल्वेस्टेशन आहे. भारतीय रेल्वेने या रेल्वेस्टेशनची पुनर्विकास योजनेमध्ये निवड केली आहे.

औरंगाबाद : औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन हे दक्षिण मध्य रेल्वेमधील महत्त्वाचे रेल्वेस्टेशन आहे. भारतीय रेल्वेने या रेल्वेस्टेशनची पुनर्विकास योजनेमध्ये निवड केली आहे.‘पीपीपी’ मॉडेलमध्ये रेल्वेस्टेशनचे सौंदर्यीकरण आणि व्यावसायीकरण होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षांवर पूर्णपणे उतरेल आणि भारतीय रेल्वेच्या उत्पन्नातही मोठी वाढ होईल, असे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता म्हणाले.औरंगाबाद रेल्वेस्टेशनची सोमवारी पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. विभागांमधील तांत्रिक बाबी, प्रवाशांच्या सोयी-सुविधा, नियमांचे पालन इ. बाबी पडताळून पाहण्यासाठी तसेच लोकप्रतिनिधींच्या मागण्या जाणून घेण्यासाठी निरीक्षण केले जात असल्याचे ते म्हणाले. रेल्वेस्टेशनवर मल्टिफंक्शनल कॉम्प्लेक्स बनविण्यात आले आहे. यामध्ये शॉपिंग एरिया विकसित केला जात आहे. रेल्वेस्टेशनवरील विश्रामगृहास प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. परंतु हॉटेलच्या तुलनेत ते किफायतशीर असल्याचे गुप्ता म्हणाले.विभागात भेदभाव नाहीदक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे, असे संघटनांकडून आरोप होतात. यावर गुप्ता म्हणाले, दक्षिण मध्य रेल्वेला सर्व विभाग सारखेच आहेत. नियमानुसार आवश्यक असणाऱ्या सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.‘डीएमआयसी’च्या दृष्टीने प्रयत्न‘डीएमआयसी’मुळे आगामी काळात प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे येथून अधिकाधिक शहरांबरोबर कनेक्टिव्हिटी वाढविण्याची गरज आहे. परंतु येथे पीटलाईन नाही. त्यादृष्टीने प्रयत्न केला जाईल, असे गुप्ता म्हणाले.